‘अशोक’कडून दोनदा तोडणी वाहतूक खर्चात कपात; ‘स्वाभिमानी’ची ११७ रुपये प्रती टन परत करण्याची मागणी

श्रीरामपूर-अशोक सहकारी साखर कारखान्याने २०२१-२२ या हंगामातील गाळपास आलेल्या ऊसाच्या एफआरपीमधून दोनदा तोडणी वाहतूक खर्च कापल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष...

श्रीरामपूर-
अशोक सहकारी साखर कारखान्याने २०२१-२२ या हंगामातील गाळपास आलेल्या ऊसाच्या एफआरपीमधून दोनदा तोडणी वाहतूक खर्च कापल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले व सुरेश ताके यांनी साखर सहसंचालकांकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले की, एकदा गाळपास आलेल्या उसातुन  दोनदा कपात म्हणजे अशोकच्या संचालक मंडळाचा शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडाच आहे. सोमवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी प्रति टन जास्तीचे घेतलेले ११७ रुपये प्रमाणे ७ कोटी २१ लाख ५६ हजार २८७ रुपये परत मागावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.निवेदनात पुढे म्हटले की, २०२०-२१ घ्या हंगामात अशोक सहकारी साखर कारखान्याचे ६,९०,००५ टन गाळप झाले होते पैकी ६,००,२१२ में. टन गाळप १ नोव्हेंबर ते ३१ मार्च या काळात झाले होते. १ एप्रिल ते २३ एप्रिल या २३ दिवसांत ८९,७३३ में. टन गाळप झाले होते. २०२०-२१ या वर्षात अशोक ने संपूर्ण हंगामातील गाळप झालेल्या ऊसाचा तोडणी वाहतूक खर्च ऊस उत्पादकांच्या एफआरपीमधून वजा केला होता परंतु त्यानंतर २०२१-२२ साली अशोक कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक वर्षनिहाय तोडणी व वाहतूक खर्चाची आकारणी केली व आजपर्यंत त्याच पध्दतीने आकारणी होत आहे.त्यामुळे 2021-22 या हंगामात मागील हंगामातील 1/4/21 नंतरचे 89,733 में.टन ऊसाची तोडणी व वाहतूक खर्च 7,21,56,287 रुपये दुसऱ्यांदा म्हणजे आर्थिक वर्ष 1/4/2021 ते 31/3/2022 यामधे तोडणी वाहतूक झालेल्या ऊसाच्या FRP मधुन कपात केलेली आहे. त्यामुळे मागील वर्षी म्हणजे 2020-21 मधे 629 रुपये प्रती टन असलेला तोडणी वाहतूक खर्च २०२१-२२ मधे ७८१ रुपये प्रती टन इतका वाढलेला आहे.त्यातही २०२०-२१ चे हंगामात कारखान्याचे गाळप सुरू झाल्यापासून ते ३१ मार्च पर्यंत ६,००२७२ में.टन ऊसाचे तोडणी वाहतूक खर्चासाठी ६०३.३२ रुपये खर्च आला तर १ एप्रिल ते कारखाना बंद होईपर्यंत २३/०४/२०२१ या २३ दिवसांत ८९,७३३ में.टन गाळप झालेले होते त्यासाठी प्रती मे.टन ८०४ रु आहे म्हणजे एकाच हंगामात शेवटचे २३ दिवस प्रती टन २०० रुपयांची  वाढ केलेली होती.२०२१-२२ चे हंगामात ८,५२,७९२ टन ऊसाचे गाळप झालेले होते. पैकी ६,१३,४१२ टन गाळप ३१ मार्च २०२२ पर्यंत झालेले होते.उर्वरित गाळप १ एप्रिल ते ११ जुन या काळात झालेले होते.मागील हंगामातील ७,२१,५६,२८७ ÷ ६,१३,४१२ टन = ११७  प्रती टन पैसे ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांना अशोकच्या संचालक मंडळाने दिलेच पाहिजेत.या विषयी चे निवेदन स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले,देवराज कोकणे व सुरेश ताके  यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयात दि. २६/०९/२०२५ रोजी दिले.त्यासाठी सभासदांनी येत्या सोमवारी होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत आग्रही मागणी करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी केले आहे.

‘अशोक’च्या चुकीच्या निर्णयप्रक्रियेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले व सुरेश ताके यांनी साखर सहसंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!