श्रीरामपूर-
अशोक सहकारी साखर कारखान्याने २०२१-२२ या हंगामातील गाळपास आलेल्या ऊसाच्या एफआरपीमधून दोनदा तोडणी वाहतूक खर्च कापल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले व सुरेश ताके यांनी साखर सहसंचालकांकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले की, एकदा गाळपास आलेल्या उसातुन दोनदा कपात म्हणजे अशोकच्या संचालक मंडळाचा शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडाच आहे. सोमवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी प्रति टन जास्तीचे घेतलेले ११७ रुपये प्रमाणे ७ कोटी २१ लाख ५६ हजार २८७ रुपये परत मागावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.निवेदनात पुढे म्हटले की, २०२०-२१ घ्या हंगामात अशोक सहकारी साखर कारखान्याचे ६,९०,००५ टन गाळप झाले होते पैकी ६,००,२१२ में. टन गाळप १ नोव्हेंबर ते ३१ मार्च या काळात झाले होते. १ एप्रिल ते २३ एप्रिल या २३ दिवसांत ८९,७३३ में. टन गाळप झाले होते. २०२०-२१ या वर्षात अशोक ने संपूर्ण हंगामातील गाळप झालेल्या ऊसाचा तोडणी वाहतूक खर्च ऊस उत्पादकांच्या एफआरपीमधून वजा केला होता परंतु त्यानंतर २०२१-२२ साली अशोक कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक वर्षनिहाय तोडणी व वाहतूक खर्चाची आकारणी केली व आजपर्यंत त्याच पध्दतीने आकारणी होत आहे.त्यामुळे 2021-22 या हंगामात मागील हंगामातील 1/4/21 नंतरचे 89,733 में.टन ऊसाची तोडणी व वाहतूक खर्च 7,21,56,287 रुपये दुसऱ्यांदा म्हणजे आर्थिक वर्ष 1/4/2021 ते 31/3/2022 यामधे तोडणी वाहतूक झालेल्या ऊसाच्या FRP मधुन कपात केलेली आहे. त्यामुळे मागील वर्षी म्हणजे 2020-21 मधे 629 रुपये प्रती टन असलेला तोडणी वाहतूक खर्च २०२१-२२ मधे ७८१ रुपये प्रती टन इतका वाढलेला आहे.त्यातही २०२०-२१ चे हंगामात कारखान्याचे गाळप सुरू झाल्यापासून ते ३१ मार्च पर्यंत ६,००२७२ में.टन ऊसाचे तोडणी वाहतूक खर्चासाठी ६०३.३२ रुपये खर्च आला तर १ एप्रिल ते कारखाना बंद होईपर्यंत २३/०४/२०२१ या २३ दिवसांत ८९,७३३ में.टन गाळप झालेले होते त्यासाठी प्रती मे.टन ८०४ रु आहे म्हणजे एकाच हंगामात शेवटचे २३ दिवस प्रती टन २०० रुपयांची वाढ केलेली होती.२०२१-२२ चे हंगामात ८,५२,७९२ टन ऊसाचे गाळप झालेले होते. पैकी ६,१३,४१२ टन गाळप ३१ मार्च २०२२ पर्यंत झालेले होते.उर्वरित गाळप १ एप्रिल ते ११ जुन या काळात झालेले होते.मागील हंगामातील ७,२१,५६,२८७ ÷ ६,१३,४१२ टन = ११७ प्रती टन पैसे ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांना अशोकच्या संचालक मंडळाने दिलेच पाहिजेत.या विषयी चे निवेदन स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले,देवराज कोकणे व सुरेश ताके यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयात दि. २६/०९/२०२५ रोजी दिले.त्यासाठी सभासदांनी येत्या सोमवारी होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आग्रही मागणी करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी केले आहे.
