…अन्यथा प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात भाकड जनावरे सोडू;शेतकरी संघटनेचा इशारा

श्रीरामपूर-राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करूनत्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे यांना...

श्रीरामपूर-
राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून
त्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे यांना वगळण्यात यावे अन्यथा प्रशासनाच्या गाव पातळीवरील पोलीस चौकी, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात भाकड जनावरे सोडणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.
दिनांक 12 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या माळेवाडी शाखेने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्तीसह गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून त्यामधून विदेशी गोवंश व भाकड जनावरे वगळावी यासाठी माळेवाडी येथील तलाठी कार्यालयावर मोर्चा नेला. सदर मोर्चे प्रसंगी मौजे माळवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी सौ. सरगये नावूर मंडल पशु चिकित्सक केंद्राचे डॉ.श्री डांगे, टाकळीभान चे डॉ.शुभम निर्मळ यांना आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन दिले. तसेच यावेळी पशुपालकांनी दिलेली जर्सी गोऱ्हे शासनाच्या ताब्यात देण्यात आली. अनिल औताडे, भागवत शेळके, चंद्रकांत वमने, नंदू लहारे, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे, प्रदीप काळे आदि पशुपालकांनी आपली अनुत्पादक जर्सी गोऱ्हे आंदोलनस्थळी आणून ग्राममहसूल अधिकारी यांच्या ताब्यात दिली. यावेळी माळेवाडी शाखेचे शाखा अध्यक्ष दिलीप औताडे, उपाध्यक्ष शैलेश वमने, दिलीप औताडे, माजी सरपंच रामभाऊ औताडे, हरिभाऊ ताके, महांकळ वाडगाव शाखेचे शाखाध्यक्ष कडू पाटील पवार, उपाध्यक्ष इंद्रभान चोरमल, गोरख औताडे ,नारायण पवार, मदन हाडके, राजेंद्र वमने, प्रवीण वमने, आयुब शेख, बाबासाहेब औताडे, गोकुळ कडू, गणेश रसाळ आदि शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष औताडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकी वेळी सगळ्याच राजकीय पक्षांनी ‘सातबारा कोरा करू’असे आश्वासित करूनही आपली फसवणूक केली. आज राज्यात सरासरी दररोज सहा ते सात दुर्दैवी शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यकर्त्यांना या गोष्टीचे काहीच वाटत नाही. शेतकरी आत्महत्या ही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या उंबरठ्यावर पोहोचली असून शेतकऱ्यांवर असलेले कर्ज हे सरकारचेच पाप आहे. या पापाचे परिमार्जन करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा व तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे वगळून सुधारणा करणे सह वन्यप्राणी जीवा पासून शेती पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे सदर कायदा ही तात्काळ रद्द करावा अन्यथा प्रशासनाच्या गाव पातळीवरील पोलीस चौकी, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात भाकड जनावरे सोडणार असल्याचा सज्जड इशारा जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी सरकारला दिला आहे.

शेतकरी संघटनेने आपली भाकड जनावरे माळेवाडी येथील प्रशासकीय कार्यालयात नेऊन सोडली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!