…अन्यथा प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात भाकड जनावरे सोडू;शेतकरी संघटनेचा इशारा

श्रीरामपूर-राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करूनत्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे यांना...

श्रीरामपूर-
राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून
त्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे यांना वगळण्यात यावे अन्यथा प्रशासनाच्या गाव पातळीवरील पोलीस चौकी, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात भाकड जनावरे सोडणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.
दिनांक 12 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या माळेवाडी शाखेने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्तीसह गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून त्यामधून विदेशी गोवंश व भाकड जनावरे वगळावी यासाठी माळेवाडी येथील तलाठी कार्यालयावर मोर्चा नेला. सदर मोर्चे प्रसंगी मौजे माळवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी सौ. सरगये नावूर मंडल पशु चिकित्सक केंद्राचे डॉ.श्री डांगे, टाकळीभान चे डॉ.शुभम निर्मळ यांना आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन दिले. तसेच यावेळी पशुपालकांनी दिलेली जर्सी गोऱ्हे शासनाच्या ताब्यात देण्यात आली. अनिल औताडे, भागवत शेळके, चंद्रकांत वमने, नंदू लहारे, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे, प्रदीप काळे आदि पशुपालकांनी आपली अनुत्पादक जर्सी गोऱ्हे आंदोलनस्थळी आणून ग्राममहसूल अधिकारी यांच्या ताब्यात दिली. यावेळी माळेवाडी शाखेचे शाखा अध्यक्ष दिलीप औताडे, उपाध्यक्ष शैलेश वमने, दिलीप औताडे, माजी सरपंच रामभाऊ औताडे, हरिभाऊ ताके, महांकळ वाडगाव शाखेचे शाखाध्यक्ष कडू पाटील पवार, उपाध्यक्ष इंद्रभान चोरमल, गोरख औताडे ,नारायण पवार, मदन हाडके, राजेंद्र वमने, प्रवीण वमने, आयुब शेख, बाबासाहेब औताडे, गोकुळ कडू, गणेश रसाळ आदि शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष औताडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकी वेळी सगळ्याच राजकीय पक्षांनी ‘सातबारा कोरा करू’असे आश्वासित करूनही आपली फसवणूक केली. आज राज्यात सरासरी दररोज सहा ते सात दुर्दैवी शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यकर्त्यांना या गोष्टीचे काहीच वाटत नाही. शेतकरी आत्महत्या ही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या उंबरठ्यावर पोहोचली असून शेतकऱ्यांवर असलेले कर्ज हे सरकारचेच पाप आहे. या पापाचे परिमार्जन करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा व तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे वगळून सुधारणा करणे सह वन्यप्राणी जीवा पासून शेती पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे सदर कायदा ही तात्काळ रद्द करावा अन्यथा प्रशासनाच्या गाव पातळीवरील पोलीस चौकी, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात भाकड जनावरे सोडणार असल्याचा सज्जड इशारा जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी सरकारला दिला आहे.

शेतकरी संघटनेने आपली भाकड जनावरे माळेवाडी येथील प्रशासकीय कार्यालयात नेऊन सोडली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!