मराठ्यांचा श्रीरामपूरात जल्लोष;फटाक्यांची आतषबाजी अन गुलालाची उधळण

श्रीरामपूर-मराठा आरक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेत गेल्या दोन वर्षापासून अग्रभागी असलेल्या अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशस्वीतेचा शहरात गुलाल उधळून...

श्रीरामपूर-
मराठा आरक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेत गेल्या दोन वर्षापासून अग्रभागी असलेल्या अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशस्वीतेचा शहरात गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. त्यानिमित्त बेलापूर रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड,मेन रोड मार्गे मोटरसायकल रॅली काढून महात्मा गांधी पुतळ्यासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आणि मराठा आंदोलकांनी मुंबईत केलेले आंदोलन यामुळे मराठा आरक्षण मिळाल्याने  शहरातील व ग्रामीण भागातील मराठा बांधवांनी दैनिक जय बाबा कार्यालयापासून डोलीबाजा वाद्य,फटाक्यांची आतिषबाजी करीत भगवे ध्वज घेऊन मोटर सायकल रॅली काढली. यावेळी नगरपरिषद समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार करून जय भवानी जय शिवाजी,एक मराठा लाख मराठा,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना नागेश सावंत म्हणाले की, हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅजेट मधून आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाला न्याय मिळाला असून आमच्यासाठी आजचा क्षण म्हणजे एक प्रकारची दिवाळीच असल्याचे सांगितले.तर ॲड,बाळासाहेब आगे म्हणाले,आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या असून मराठा समाजाला जरांगे पाटलांसारखा एक लढाऊ योद्धा मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन दिवस हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे मराठा समाजाच्या वतीने आम्ही सर्व आभार मानत आहोत.
तसेच यावेळी सुरेश कांगुणे यांनी सांगितले की,गेल्या दोन वर्षापासून आम्ही अखंड मराठा समाज श्रीरामपूर आरक्षणाच्या प्रश्नावर विविध प्रकारचे आंदोलन केले आहे.या सर्व आंदोलनांना श्रीरामपूर येथील सर्व जाती धर्माच्या बांधवानी मोठे सहकार्य केलेले आहे,त्यांचे आम्ही आभार मानत असल्याचे सांगितले. या आनंदोत्सवासात माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक,पंडितराव बोंबले, अण्णासाहेब डावखर,राजेंद्र मोरगे,शरद अंबादास नवले, सुधाकर बोंबले,शिवाजीराव भोसले,प्रमोद भोसले,ॲड, गणेश सिनारे,विकास डेंगळे ऋषिकेश मोरगे,अमोल बोंबले,रोहन डावखर,ॲड, अरुण लबडे,ज्ञानेश्वर मोरगे,विशाल धनवटे,गोकुळ गायकवाड,मनोज शेळके,दत्तात्रय जाधव,
सुधाकर तावडे,बी.जी.गायधने, रोहीत भोसले,अशोक पिसे,गोकुळ कुताळ,संजय गांगड,योगेश जाधव,केतन खोरे,शशिकांत शिंदे,पद्माकर देशमुख,प्रसाद खरात,राजेंद्र भोसले,युवराज थोरात, नंदकिशोर लबडे,
संजय करंडे,बाळासाहेब मेटे,विनोद उंडे,चंद्रकांत काळे,प्रतिक यादव,ॲड,कैलास आगे,पोपटराव आदिक,बाबासाहेब डांगे,ऋषिकेश दिघे,महेश लबडे,अजिंक्य काळे,गौरव नवले,यश नवले, प्रवीण फरगडे,युवराज आगे, गुरु आगे,यश शेळके, आदित्य शेळके,लकी सेठी यांच्यासह अनेक बांधव सहभागी झाले होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!