मराठ्यांचा श्रीरामपूरात जल्लोष;फटाक्यांची आतषबाजी अन गुलालाची उधळण

श्रीरामपूर-मराठा आरक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेत गेल्या दोन वर्षापासून अग्रभागी असलेल्या अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशस्वीतेचा शहरात गुलाल उधळून...

श्रीरामपूर-
मराठा आरक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेत गेल्या दोन वर्षापासून अग्रभागी असलेल्या अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशस्वीतेचा शहरात गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. त्यानिमित्त बेलापूर रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड,मेन रोड मार्गे मोटरसायकल रॅली काढून महात्मा गांधी पुतळ्यासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आणि मराठा आंदोलकांनी मुंबईत केलेले आंदोलन यामुळे मराठा आरक्षण मिळाल्याने  शहरातील व ग्रामीण भागातील मराठा बांधवांनी दैनिक जय बाबा कार्यालयापासून डोलीबाजा वाद्य,फटाक्यांची आतिषबाजी करीत भगवे ध्वज घेऊन मोटर सायकल रॅली काढली. यावेळी नगरपरिषद समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार करून जय भवानी जय शिवाजी,एक मराठा लाख मराठा,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना नागेश सावंत म्हणाले की, हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅजेट मधून आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाला न्याय मिळाला असून आमच्यासाठी आजचा क्षण म्हणजे एक प्रकारची दिवाळीच असल्याचे सांगितले.तर ॲड,बाळासाहेब आगे म्हणाले,आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या असून मराठा समाजाला जरांगे पाटलांसारखा एक लढाऊ योद्धा मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन दिवस हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे मराठा समाजाच्या वतीने आम्ही सर्व आभार मानत आहोत.
तसेच यावेळी सुरेश कांगुणे यांनी सांगितले की,गेल्या दोन वर्षापासून आम्ही अखंड मराठा समाज श्रीरामपूर आरक्षणाच्या प्रश्नावर विविध प्रकारचे आंदोलन केले आहे.या सर्व आंदोलनांना श्रीरामपूर येथील सर्व जाती धर्माच्या बांधवानी मोठे सहकार्य केलेले आहे,त्यांचे आम्ही आभार मानत असल्याचे सांगितले. या आनंदोत्सवासात माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक,पंडितराव बोंबले, अण्णासाहेब डावखर,राजेंद्र मोरगे,शरद अंबादास नवले, सुधाकर बोंबले,शिवाजीराव भोसले,प्रमोद भोसले,ॲड, गणेश सिनारे,विकास डेंगळे ऋषिकेश मोरगे,अमोल बोंबले,रोहन डावखर,ॲड, अरुण लबडे,ज्ञानेश्वर मोरगे,विशाल धनवटे,गोकुळ गायकवाड,मनोज शेळके,दत्तात्रय जाधव,
सुधाकर तावडे,बी.जी.गायधने, रोहीत भोसले,अशोक पिसे,गोकुळ कुताळ,संजय गांगड,योगेश जाधव,केतन खोरे,शशिकांत शिंदे,पद्माकर देशमुख,प्रसाद खरात,राजेंद्र भोसले,युवराज थोरात, नंदकिशोर लबडे,
संजय करंडे,बाळासाहेब मेटे,विनोद उंडे,चंद्रकांत काळे,प्रतिक यादव,ॲड,कैलास आगे,पोपटराव आदिक,बाबासाहेब डांगे,ऋषिकेश दिघे,महेश लबडे,अजिंक्य काळे,गौरव नवले,यश नवले, प्रवीण फरगडे,युवराज आगे, गुरु आगे,यश शेळके, आदित्य शेळके,लकी सेठी यांच्यासह अनेक बांधव सहभागी झाले होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!