मानाच्या मंडळाकडून एकल महिलांचा सन्मान;अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केली श्रींची आरती

श्रीरामपूर-भारतीय राज्यघटनेचे सार असलेले “संधीची व दर्जाची समानता” हे तत्त्व प्रत्यक्षात आणत श्रीरामपूरच्या आझाद मैदानातील सार्वजनिक गणेश मंडळाने एकल महिलांना गणेशोत्सवानिमित्त...

श्रीरामपूर-
भारतीय राज्यघटनेचे सार असलेले “संधीची व दर्जाची समानता” हे तत्त्व प्रत्यक्षात आणत श्रीरामपूरच्या आझाद मैदानातील सार्वजनिक गणेश मंडळाने एकल महिलांना गणेशोत्सवानिमित्त श्रींची आरती करण्याचा मान देत त्यांचा सन्मान केला.
मंडळ यंदा पंचाहत्तरावे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. जुन्या रूढी, परंपरांमुळे विविध उत्सव व इतर सोहळ्यांमध्ये एकल महिलांना  सहभागी करून न घेता त्यांची काहीही चूक नसताना अंधश्रद्धेपायी अशुभ समजून विविध घरगुती व सामाजिक, धार्मिक सोहळ्यांपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी एकल महिलांसाठी काम करणाऱ्या साऊ एकल महिला समितीने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक गणेश मंडळांच्या सहकार्याने एकल महिलांच्या हस्ते गणफतीची आरती करण्याचा उपक्रम राबविला जात आहे.
त्यानुसार श्रीरामपूर ( जि. अहिल्यानगर) येथील आझाद मैदानातील पंचाहत्तर वर्षे पूर्ण करून यंदा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीची आरती एकल महिलांच्या हस्ते करून एकल महिलांना मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांना एकल महिलांसाठी करीत असलेल्या कार्याबद्दल मंडळाच्या वतीने सूर्यकांत सगम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी  मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य बाळासाहेब जपे, साऊ एकल महिला समितीचे मुकुंद टंकसाळे, गलांडे पाटील विद्यालयाच्या उपशिक्षिका कल्पना जानराव साळवे तसेच मंडळाचे पदाधिकारी मनोजकुमार नवले, सूर्यकांत सगम, अनिल छाबडा, इसाक पटेल, किशोर फाजगे, वैभव सूरडकर, प्रमोद पत्की, कुणाल करंडे, तेजस सूरडकर, संजीव पगारे आदी उपस्थित होते. श्रीपाद गोऱ्हे यांनी या विधी सोहळ्याचे पौरोहित्य केले.

सार्वजनिक गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीची आरती एकल महिलांच्या हस्ते करून एकल महिलांना मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!