‘हिंद दी चादर’ शहीदी समागम शताब्दीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

श्रीरामपूर-“हिंद दी चादर” श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे सन २०२५२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे...

श्रीरामपूर-
“हिंद दी चादर” श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे सन २०२५२६ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असून, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकार, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी ग्राउंड (सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा, आसर्जन) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या कालावधीत सदर ठिकाणी दरबार साहिब असणार असल्याने भाविकांना कार्यक्रमस्थळी अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, परिसर स्वच्छ व सुस्थितीत राहावा, यासाठी दि. १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता विशेष श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा श्रमदान उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था व स्वयंसेवकांच्या सहभागातून राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून सेवाभाव, सामाजिक एकात्मता व स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे.
नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून त्यांच्या सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी आढावा बैठकीत दिल्या.नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या  या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालय येथे आयोजित बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी प्रत्यक्ष तर दूरदृश्यप्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संत बाबा कुलवंत सिंगजी, जथेदार तख्त सचखंड श्री हजूर साहेब और पंज प्यारे,नांदेड,संत बाबा नरिंदर सिंगजी,संत बाबा बलविंदर सिंगजी,गुरुद्वारा लंगर साहेब,संत बाबा हरणामसिंगजी, मुखी दमदमी टकसाल,रामेश्वर भाऊ नाईक (राज्यस्तरीय समितीचे समन्वयक),महेंद्रजी रामचुरा (धर्म जागरण प्रचारक) ,सिद्धेश्वरजी बिराजदार (धर्म जागरण प्रचारक)
रघबीरसिंह कथुरिया (राजू) ( राज्यसमिती सदस्य)
भगवंत सिंग बतरा (क्षेत्रीय समिती अध्यक्ष, अहिल्यानगर),रणजित सिंग आहुजा,सरबजीत सिंग सेठी
अमरिक सिंग चुग,बलविंदर सिंग बतरा,हरिंदर सिंग बतरा
हरचरण सिंग गुरुवाडा,ओम नारंग ,जास्मीत सिंग बतरा,सन्मीत सिंग चुग,रणजीत सिंग सेठी आदींनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!