श्रीरामपूर प्रभाग रचनेत अनेकांना धक्का;पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांची होणार दमछाक
श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषदेची प्रभाग रचना मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जाहीर केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागांच्या नव्याने झालेल्या पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांना नवा प्रभाग...
श्रीरामपूर- श्रीरामपूर नगरपरिषदेची प्रभाग रचना मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जाहीर केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागांच्या नव्याने झालेल्या पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांना नवा प्रभाग शोधावा लागणार आहे तर काहींचा नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्यातच कस लागणार आहे.नवीन प्रभाग रचनेनुसार आता 34 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत.पूर्वी ही संख्या 31 इतकी होती.या नवीन प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.प्रत्येक प्रभागातून 2 नगरसेवक निवडुण दिले जाणार आहेत.२०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येक प्रभागाची बेस लोकसंख्या ५२५२ अशी गृहीत धरली गेली आहे. प्रभाग रचनेत रेल्वे लाईन व पाटपाण्याचे कालवे ही नैसर्गिक सीमा धरली गेली आहे. त्यामुळे काही इच्छुक नगरसेवकांना सुटसुटीत मतदारसंघ मिळाला असून, काहींना नव्याने प्रभाग शोधावा लागणार आहे.जुन्या माजी नगरसेवकांना विशेष अडचण नसली, तरी नव्या इच्छुकांकडून हरकती नोंदवल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय निघते, त्यावर पुढील सर्वच राजकीय पक्षांची गणिते ठरणार आहेत. प्रत्येक पक्षाला प्रत्येक प्रभागात उमेदवार देताना अडचणी येणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
आरक्षण कसे राहणार- नगरसेवक संख्या-३४ अनुसूचित जातीसाठी जागा-६ अनुसूचित जमातीसाठी जागा-१ इतर मागासवर्गीय जागा-९ खुला गट-१८
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली
श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी
श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा
श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा
श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु