महिना उलटूनही आरोपींना अटक नाही;श्रीरामपूर शहरात भव्य मोर्चा

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे झालेल्या हिंदु मातंग समाजाच्या निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवुन हत्या करणाऱ्या आरोपींना महिना उलटूनही अटक न झाल्याने...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे झालेल्या हिंदु मातंग समाजाच्या निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवुन हत्या करणाऱ्या आरोपींना महिना उलटूनही अटक न झाल्याने आरोपींना अटक करण्याची मागणी करत शनिवारी दुपारी शहरात भव्य मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मातंग समाज बांधव तसेच हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.
श्रीरामपूर शहरातील भगतसिंग चौकातून या मोर्चाला दुपारी सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवतीर्थ येथे आला. शिवतीर्था समोर विराट मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन तेथे शिवप्रहार प्रतिष्ठान प्रमुख सुरजभाई आगे, विराट प्रतिष्ठानचे प्रदीप सरोदे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिंदू मातंग बंधू निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवुन हत्या करणारे वाळू तस्कर व त्यांचे साथीदार इतर आरोपींच्या अटकेची मागणी करत फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच हत्या करणाऱ्या वाळू तस्कर आरोपींना पाठीशी घालणाऱ्या व पाठबळ देणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्यालाही आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी मयत निलेश शेंडगे यांच्या मुलीने भावना व्यक्त करत आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली.यावेळी भावना व्यक्त करताना मुलगी भावुक झाल्याने यावेळी महिलांचेही अश्रू अनावर झाले होते.सभेनंतर हजारो मोर्चेकरांच्या उपस्थितीत पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हेही उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!