शिवरायांचा अवमान अन ‘त्यांच्या’कडून आत्मक्लेश,याचे आश्चर्य वाटते-पालकमंत्री विखे पाटील यांनी फटकारले

श्रीरामपुर-श्रीरामपूरात काँग्रेसचे स्थानिक पुढारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याचे समर्थन करीत आहेत.महाराजांचा अवमान झाल्यानंतर ते आत्मक्लेश आंदोलन करतात, याचे मला आश्चर्य...

श्रीरामपुर-
श्रीरामपूरात काँग्रेसचे स्थानिक पुढारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याचे समर्थन करीत आहेत.महाराजांचा अवमान झाल्यानंतर ते आत्मक्लेश आंदोलन करतात, याचे मला आश्चर्य वाटते.त्यांना मनाची नाही तर जनाची तरी लाज वाटायला हवी.इतका निर्लज्जपणा मी आजवरच्या राजकारणा त कधी पहिला नाही,अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फटकारले.
विखे पाटील श्रीरामपुरात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,आपणावर जिल्ह्यात वातावरण बिघडवण्याचा होत असलेला आरोप पोरकटपणाचा असून विरोधकांना जिल्ह्यात सर्वत्र पराभव दिसत असल्याने आपल्यावर असे आरोप केले जात आहेत.
विरोधकांकडे आज कुठलेही काम राहिलेले नाही.केवळ टीकाटिप्पणी करणे हा एकमेव उद्योग त्यांचा सुरू आहे.श्रीरामपूर मध्ये भाजप-राष्ट्रवादी युतीला जनतेचे पाठबळ मिळत आहे. स्वाभाविकच त्यामुळे विरोधकांची चिडचिड सुरू आहे.त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे माझ्यावर ते टीका करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.त्यांचा अवमान झाल्यामुळे त्याची प्रतिक्रिया जनतेतुन उमटली.याउलट देशपातळीवर असलेली काँग्रेसच्या नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी जनतेसमोर आली.बिहार राज्याच्या निवडणुकांनी ते स्पष्ट केले. आज जिल्ह्यात संगमनेरमध्ये काँग्रेसचे मोठे नेते निवडणूकित पक्षाचे चिन्ह घ्यायला तयार नाहीत.ही मोठी शोकांतिका आहे.याचा अर्थ पक्ष संपुष्टात आलेला आहे.आता हा पक्ष फक्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपुरता राहतो की काय अशी शंका यायला लागली आहे.

श्रीरामपूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!