शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद घालणे नतद्रष्टपणा-पालकमंत्री विखे पाटील;अलघ,डावखर,गुलाटी यांसह अनेकांचा भाजपत प्रवेश

श्रीरामपूर-छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद घालणे हाच नतद्रष्टपणा होता.राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर...

श्रीरामपूर-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद घालणे हाच नतद्रष्टपणा होता.राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेही भव्य  स्मारक उभे राहील.येत्या सहा महीन्यात विकास प्रक्रीयेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अशोक बॅकेचे माजी चेअरमन नारायणराव डावखर, पहील्या माजी नगराध्यक्षा इंदूमती डावखर,गजेंद्र डावखर, रवि गुलाटी, हेमा गुलाटी,राजेश अलग यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे  सर्वाचे स्वागत करून अभिनंदन केले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,दिलीप भालसिंग,दिपक पटारे,संजय फंड,आशिष धनवटे श्रीनिवास बिहाणी जितेंद्र छाजेड बाबासाहेब चेडे केतन खोरे रवी पाटील स्वाती चव्हाण पुष्पाताई हरदास शरद नवले नानासाहेब शिंदे गिरीधर आसने आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पक्ष संघटनेला महत्व आहे.सर्वाच्या पाठीशी पक्षाची ताकद असल्यामुळे प्रतयेकजण इथे मोठा आहे.व्यक्तिला  नाही तर  संघटनेला महत्व असल्याचे सांगून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वाच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की चाळीस वर्षे लागली.मात्र महायुती सरकार आल्यामुळे स्मारकाचे स्वप्न पूर्ण होवू शकले.अनेक वर्ष फक्त जागेवरून वाद झाले.महाराजांच्या स्मारकावरून वाद होणे हाच  नतद्रष्ट पणा असल्याचा उल्लेख केला.

श्रीरामपूर शहारातील नाॅर्दनब्रॅच कालव्याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले असून येत्या सहा महीन्यात विकासाच्या माध्यामातून शहराचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भाररत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी यापुर्वीच मंजूर झाला असून भव्य स्मारक लवकर उभे राहील.
दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदी मराठी गाण्याची मैफल आयोजित करण्यात आली होती.यातील काही कलाकार संगमनेचे असल्याचा उल्लेख करून संगमनेरात फार चांगले कलाकार असल्याचा मिश्कील टिपणी करून  स्नेहमिलन कार्यक्रमात आज मिसळ संगमनेरची आणि पाव लोणीचे असल्याचे उल्लेख केला.कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते विविध संस्थां संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक आजी माजी नगरसेवकांनी भाजपत जाहीर प्रवेश केला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!