श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहर हे एका कुटुंबाप्रमाणे एकत्रित वावरत होते परंतु काहींना ते देखवले गेले नाही.त्यांनी श्रीरामपूरच्या बाजारपेठेवरच हल्ला चढवत अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली बाजारपेठ उद्धवस्त केली.अशा लोकांना श्रीरामपूरची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले.आमदार हेमंत ओगले यांच्या स्थानिक विकास निधीतून श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.यावेळी करण ससाणे म्हणाले की, आ. ओगले यांच्या पहिल्याच वर्षाच्या आमदार निधी मधून श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे संपन्न होत आहेत, नागरिकांच्या हिताच्या कामाला प्राधान्य दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, काही विघ्नसंतोषी लोक श्रीरामपूरला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे, जे गाव स्व. जयंतराव ससाणे यांनी तळ हाताच्या फोडा सारखे जपले आहे. त्यामुळे जनता सुज्ञ आहे. आ.ओगले यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याने महत्वपूर्ण कामे मार्गी लागल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी सभापती बाबासाहेब दिघे , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मुजफ्फर शेख, उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, दिलिप नागरे, दत्तात्रेय सानप, नगरसेवक शामलिंग शिंदे, भरत कुंकुलोळ,प्रणिती दीपक चव्हाण, अशोक बागुल, शहराध्यक्ष लकी सेठी, पंडीत बोंबले, के सी शेळके, मुन्ना पठाण, रितेश रोटे, निखिल पवार, तिलक डूगरवाल, अरुण मंडलिक, रवी खीलारी, प्रसाद चौधरी, दिपक वमने, शहीद कुरेशी, रितेश एडके, सुरेश ठुबे, भाग्यश लोखंडे, प्रवीण कोठावळे, सुभाष पोटे, प्रवीण नवले, प्रशांत उचित, पाशा शिवरकर, डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन, सुनील साबळे, रोहित शिंदे, डॉ. वैभव पंडीत, अतुल शेटे यांच्यासह आदी उपस्थित होते.
