अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीने नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणणे चुकीचे-ससाणे;थोरात यांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा

श्रीरामपूर-काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार हेमंत ओगले...

श्रीरामपूर-
काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार हेमंत ओगले आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी करण ससाणे म्हणाले की,  की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संत परंपरेतून उगम पावलेला आणि जन माणसाला मार्गदर्शन करणारा अध्यात्मिक प्रवाह आहे समानतेचा, भक्तीचा आणि नैतिकतेचा संदेश देणारा हा संप्रदाय जनतेच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवत आला आहे याची सर्वांना जाण आहे आणि त्याबद्दल आपण सर्वजण आदरभावही बाळगतो, मात्र संत महंतांची मोठी परंपरा असलेल्या अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीने अशा प्रकारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, भेदाभेद भ्रम अमंगळ ही संतांची शिकवण आहे याउलट जर कोणी धर्माच्या नावाखाली समाजात द्वेष मत्सर पसरवत असेल तर तो व्यक्ती वारकरी संप्रदायाचा असू शकत नाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल उद्घाटपणे बोलणे अप्रत्यक्षरीत्या जीवे मारण्याची धमकी देण्यासारखे बोलणे निषेधार्थ असून वारकरी संप्रदायाला गालबोट लावणारे आसल्याचे म्हटले. ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले की, सहकार, सामाजिक, शिक्षक कृषी संस्कृती यासह सगळ्या क्षेत्रात थोरात परिवाराने केलेले कार्य बहुमोल आहे स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सिद्ध केलेले वेगळेपण समाज मनात खोलवर रुजलेले असल्याचे प्रतिपादन केले,
  बाबसाहेब दिघे यांनी बोलतांना सांगितले की, काँग्रेस नेते थोरात यांना धमकी देणाऱ्या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सदर निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक रमेश कोठारी, अशोक बागुल, जनार्धन जगधने, महंता यादव, अशोक उपाध्ये, कांतीभाई पटेल, ॲड.समिन बागवान, सुहास परदेशी, शंकरराव गायकवाड,शाम अडांगळे,प्रसाद चौधरी, डॉ. राजेंद्र लोंढे, विलास पुंड, भारत भवार, रावसाहेब आल्हाट,भोला दुग्गल, अशोक जगधने, रज्जाक पठाण, रणजीत जामकर, सुनील साबळे, रियाज खान पठाण,आय्याज तांबोळी, रितेश एडके, सरबजीतसिंग चुग, सनी मंडलिक, बाबा वायदंडे, शाहरुख शेख,वैभव कुऱ्हे,अमोल आवटे, गणेश काते, विशाल साळवे, अशोक साळवे, सुभाष येवले, काकासाहेब रणवरे, दादा रणवरे, किरण खंडागळे, सुरेश बनसोडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार हेमंत ओगले आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!