श्रीरामपूर-
तालुक्यातील टिळकनगर सह एकलहरे परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले उत्पादन अक्षरशः नष्ट झाले आहे. यामुळे आर्थिक संकट अधिक तीव्र झाले असून तातडीच्या उपाययोजना आणि सरकारी मदतीची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कांदा, गहू आणि इतर पिकांना याचा मोठा फटका बसला असून, तात्काळ परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सार शेख, ज्येष्ठ पत्रकार लालमोहमद जहागीरदार, सरपंच पती अनिस शेख, माजी उपसरपंच रमेश कोल्हे, विलास ठोंबरे, संजय अग्रवाल, सरपंच रिजवाना शेख, उपसरपंच अनुसया इंगळे, ग्रामपंचायत सदस्या नसिमखातून जहागीरदार, रावण निकम,निर्मला झिने, कोकिळा अग्रवाल, रामदास झिने सह शेतकऱ्यांनी केली आहे.
