रब्बीच्या दोन आवर्तनाचे नियोजन तात्काळ करा;शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष औताडे

श्रीरामपूर-भंडारदरा सिंचन प्रणालीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस, कांदा, गहू ,मका अशा सर्वच बागायती पिकांची लागवड 80 टक्के पूर्ण झालेली आहे.त्यासाठी मोठ्या...

श्रीरामपूर-
भंडारदरा सिंचन प्रणालीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस, कांदा, गहू ,मका अशा सर्वच बागायती पिकांची लागवड 80 टक्के पूर्ण झालेली आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विहिरी व बोअरचा उपसा सिंचनासाठी होत असल्याने भुजल पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी दोन आवर्तनांचे नियोजन करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की,आवर्तन कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांकडून नमुना नंबर 7 चे पाणी अर्ज कालवा निरीक्षकांनी भरून घेण्यासाठी विभागाने सूचना कराव्यात.जलसंपदा विभागाने थकबाकी अभावी कुठल्याही शेतकऱ्यांचे पाणी अर्ज नाकारू नयेत.यावर्षी खरीपामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे तसेच भंडारदरा सिंचन प्रणाली कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती पिके नुकसानीमुळे बाधित झालेले आहेत.श्रीरामपूर तालुक्यातील कॅनॉलच्या चाऱ्यांच्या परिसरातील पाणी पातळी खालावली आहे. मध्यंतरी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोन तीन तीन दिवस पिण्याचे आवर्तने घेतल्यामुळे कॅनॉलच्या परिसरातील पाण्याची परिस्थिती पंधरा-वीस दिवस पुढे ढकलण्यासारखी असली तरी कॅनॉल पासून अंतरावर असलेल्या भागांमध्ये पाणी पातळी खालवली आहे.आज रोजी धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा असून  पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून तात्काळ आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत असल्याचे जिल्हाध्यक्ष औताडे यांनी म्हटले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!