ऊस उत्पादकांनी ऊस परिषदेला उपस्थित रहावे;’स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष ताके यांचे आवाहन

श्रीरामपूर-या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी पिकहातातुन गेले आहे. केवळ ऊस...

श्रीरामपूर-
या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी पिक
हातातुन गेले आहे. केवळ ऊस पिक शेतकऱ्यांचे हातात आहे. त्यामुळे त्यातुन जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी जागृत झाला तर त्याला तसा दर मिळु शकतो,असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताके यांनी केले आहे.
ताके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साखरेचे दर ४ हजार रुपये क्विंटल पेक्षा जास्त वाढले आहेत.त्याचा फायदा करुन घेण्यासाठी येत्या १६ तारखेला जयसिंगपूर येथे होणार्‍या ऊस परिषदेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मा.खा.राजु शेट्टी यांच्या वतीने मांडण्यात येणाऱ्या ऊस दर ठरावाला अनुमोदन द्यावे.ऊस परिषदेत ठरलेला दर आपल्या जिल्ह्यातील कारखान्यांना देण्यासाठी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही राहील.शेजारच्या पुणे जिल्ह्यातील दर प्रती टन ३ हजार ५०० रुपयांपर्यंत गेलेले आहेत.आपल्याकडे आत्ता कुठे ३ हजार रुपये देऊ असे म्हणत उपकाराची भाषा काही साखर कारखानदार कार्यकर्त्यामार्फत बोलत आहेत. तर काही कारखानदारांनी ऊस दरा बाबत गुळणी धरली आहे.पुण्यात ३५०० शक्य आहे मग आपल्या कारखान्यांना का शक्य नसावा म्हणून हक्काने मागणी करणे गरजेचे आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचेकडे ऊसाच्या वजनाचा काटा मारणार्‍या कारखान्यांची यादी असल्याचे म्हटले आहे. त्याअर्थी ऊस वजनात काटा मारला जात आहे.सदरची यादी आपल्या उपस्थितीत मा.खा.राजु शेट्टी मुख्यमंत्री यांच्याकडे मागण्याचा ठराव करणार आहेत.ज्या कारखान्याला ऊस देणार आहात त्यांचा तोडणी व वाहतूक खर्च साखर आयुक्तांनी किती मंजूर केलेला आहे, याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे कारण तोडणी व वाहतूक खर्च वाढवुन ऊस दरावर दरोडा टाकण्याचा प्रकार होत आहेत.आपल्या ऊसाला जास्तीत जास्त दर मिळवण्यासाठी ऊस परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताके यांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!