आगीत गुदमरून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू;फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत क्षणार्धात होत्याचे नव्हते

श्रीरामपूर-नेवासा फाटा परिसरात कॉलेजजवळील कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला.रविवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेने परिसरात...

श्रीरामपूर-
नेवासा फाटा परिसरात कॉलेजजवळील कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
रविवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दुकानाच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेल्या मयूर अरुण रासने (वय ३६) यांच्यासह त्यांची पत्नी पायल (३०), दोन लहान मुले अंश (११) व चैतन्य (६) आणि वयोवृद्ध आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (८५) यांचा या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मयूर यांचे वडील अरुण रासने व त्यांची पत्नी हे मालेगाव येथे नातलगांकडे गेले होते, त्यामुळे ते बचावले आहेत.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, गाद्या, व इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. स्थानिकांनी बचावकार्य सुरू करत अग्निशमन दलालाही कळवले तेही घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचा वेग इतका जबरदस्त होता की आत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणे शक्य झाले नाही.या घटनेनंतर नेवासा फाटा परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने व्यावसायिक ठिकाणांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.परिसरातील व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाकडे दुकानांमध्ये अग्निशमन यंत्रणा अनिवार्य करण्याची आणि नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, सखोल तपास सुरू केला आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे.

दुर्दैवी रासने कुटुंब
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!