वायरमन अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात;सौर कृषी पंपासाठी घेतले 2500 रुपये

श्रीरामपूर-सौर कृषी पंप मंजूर करायचा असल्यास 4000 रुपये व राहत्या घराच्या वीज मीटरला सिंगल फेजचे कनेक्शन जोडण्यासाठी 500 रुपये लाच वायरमनने...

श्रीरामपूर-
सौर कृषी पंप मंजूर करायचा असल्यास 4000 रुपये व राहत्या घराच्या वीज मीटरला सिंगल फेजचे कनेक्शन जोडण्यासाठी 500 रुपये लाच वायरमनने तक्रारदार यांच्याकडे मगितली.लाचेच्या रकमेतील 2500 रुपये  तक्रादार यांच्याकडून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वायरमनला रंगेहाथ पकडले.राजेंद्र दादासाहेब कराळे, वय 41 वर्ष, धंदा- नोकरी, बाह्यस्त्रोत वायरमन, नेमणूक म.रा.वि.वि.कंपनी, करंजी कक्ष, ता.पाथर्डी असे आरोपी वायरमनचे नाव आहे.आरोपी कराळे यास ताब्यात घेण्यात आले असून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आईच्या नावे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंप मंजूर झाला. त्यानंतर तक्रारदार यांच्या गावाकरिता नेमून दिलेले वायरमन राजेंद्र दादासाहेब कराळे हे सौर कृषी पंप बसविण्याच्या ठिकाणी तक्रारदार यांचे शेतामध्ये आले व त्यांनी आल्यानंतर जागेची पाहणी केल्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल मध्ये फोटो काढले व तक्रारदार यांना म्हणाले की, सौर कृषी पंपा चे ठिकाणी लाईटचा पोल आहे त्याकरिता तुमचा सौर कृषी पंप चा अर्ज नामंजूर होऊ शकतो. त्यामुळे सौर कृषी पंप मंजूर करायचा असल्यास 4000 रुपये द्या.वायरमन हा सौर कृषी पंपाचा अर्ज नामंजूर करण्याची धमकी देत असल्याने तक्रारदार यांनी नाईलाजास्तव त्यांना 2 हजार रुपये दिले होते.

त्यानंतर वायरमन याने तक्रारदार यांना उरलेले 2000 रुपये सौर कृषी पंप बसवल्यानंतर द्या असे सांगितले व सर्वे पूर्ण करून शेतातून निघून गेले. त्यानंतर तक्रारदार यांचे शेतामध्ये सौर कृषी पंप बसविण्याचे काम पूर्ण झाले. कराळे वायरमन हे तक्रारदार यांचे शेतात कृषी सौर पंप बसविण्याच्या ठिकाणी सर्वे पूर्ण केल्याच्या मोबदल्यात 2000 रुपये तसेच तक्रारदार यांचे राहते घराचे वीज मीटरला सिंगल फेजचे कनेक्शन जोडण्यासाठी 500 रुपये असे एकूण 2500 रुपये लाच मागणी करत असले बाबतची तक्रार लाच लुचपत प्रतीबंधक विभाग येथे प्राप्त झाली होती. सदर तक्रारीप्रमाणे दि.17/08/2025 रोजी सापळा लावून आरोपी राजेंद्र कराळे यास तक्रारदार यांच्या कडून स्वतः 2500 रुपये लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले.सदर कारवाई पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्यासह पोलीस नाईक उमेश मोरे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शेखर वाघ, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हारूण शेख यांनी केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!