बळीराजाचा देवाकडे साकडे; दमदार पावसासाठी प्रार्थना | खरीपातील पिकांची मान टाकायला सुरुवात, शेतकरी चिंतेत

मान्सून सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज ऐकून आनंदलेला श्रीरामपूर तालुका आणि उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा, जून संपता-संपता पावसाच्या गायब...

baliraja

मान्सून सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज ऐकून आनंदलेला श्रीरामपूर तालुका आणि उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा, जून संपता-संपता पावसाच्या गायब झाल्याने उदास आणि चिंतेत आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी):

यंदाच्या वर्षी मान्सून सरासरी पेक्षा अधिक राहणार असल्याच्या हवामान अंदाजाने आनंदून गेलेला श्रीरामपूर तालुका तसेच उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बळीराजा जून महिना संपता संपता पाऊसच गायब झाल्याच्या काळजीने काळवंडून गेल्याचे दुर्दैवी चित्र सध्या आहे.


गेल्या २० ते २५ दिवसांपासून मोठ्या पावसाने उघडीप दिली आहे.मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जमिनीत ओल निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या उरकल्या होत्या.खरिप हंगामात आतापर्यंत ६५ टक्क्यांपर्यंत पेरण्या झालेल्या असून
यातील बहुतांश पिके आता माना टाकू लागली आहेत.कपाशी,मका,सोयाबीन आणि चारा पिकांची अवस्था पावसाअभावी वाईट झाली आहे.


दररोज सकाळपासून आभाळ भरून आलं की सोसाट्याचा वारा सुरू होतो.त्यामुळे पावसाचे जमा झालेले ढग वाऱ्याच्या बरोबरीने ओढले जाऊन श्रीरामपूर तालुका परिसर कोरडाठाक राहत आहे.


काही ठिकाणी शेतकरी भर पावसाळ्यात पिकांना पाणी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले थोडेफार पाणी देतांना दिसत आहे. जिल्ह्यात एक लाखांहून अधिक हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असून आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होणार आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात पावसाचे प्रमाण सुरवातीला अधिक होते. तर जिल्ह्याच्या उत्तर भागात जेमतेम पाऊस झाला.एकही मोठा पाऊस झाला नसल्याने त्या जेमतेम पावसावर पेरण्या केलेले शेतकरी आता संकटात सापडले आहेत.बळीराजा आता पावसासाठी देवाचा धावा करत आहे

शेतकरी वर्ग आता देवाकडे पावसासाठी साकडं घालत आहे.
बळीराजाची नजर आता आकाशाकडे, तर मनात प्रार्थना — “एकदाचा पाऊस पडो.”

Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!