श्रीरामपूर-
अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर प्रांत कार्यालय येथे आंदोलन करून जर्सी गोऱ्हे व भाकड संकरित गाई प्रांताधिकारी यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांचा हा आक्रोश मोर्चा धडकणार आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेला हा लढा असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभाग नोंदवून सरकारला जाग आणण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी केले आहे.शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने श्रीरामपूर उपविभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले की,आज रोजी शेतकऱ्यांपुढे भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यासाठी गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून विदेशी गोवंश तसेच जर्सी व व्होस्टीन भाकड गाई सदर कायद्यातून वगळण्यात याव्यात तसेच वन्य प्राणी जीव संरक्षण कायदा रद्द करण्यात यावा, त्याचबरोबर राज्यात होत असलेल्या भेसळयुक्त दुधाचा प्रतिबंध करावा, शेती साहित्याच्या सर्रास होत असलेल्या भुरट्या चोऱ्या थांबवाव्यात तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी,अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष युवराज जगताप, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, सागर गिऱ्हे,संतोष पटारे, संजय वमने, शिवाजीराव पटारे, सतीश नाईक, संदीप उघडे, सिकंदर भाई शेख, शरद असणे, प्रमोद ताके, सुजित बोडखे, इंद्रभान चोरमळ, संजय काळे, अशोक काळे, बाबासाहेब पवार, ज्ञानदेव चक्रनारायण, अनिल रोकडे आदि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
