श्रीरामपूर-
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी करून बोगस मतदानाद्वारे भाजपाने आपले लोक निवडून आणले आणि त्याच जोरावर सत्ता स्थापन केली या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या साथीने झाल्या असल्याचा आरोप आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे तसेच देशातील काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग अजून गप्प कसे असा सवाल देखील आ. ओगले यांनी केला आहे. श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस करण ससाणे म्हणाले की, निवडणूक आयोग हे घरगड्यासारखे काम करत असून एकाच नावाचे असंख्य मतदार नोंदवून तसेच हयात मयत लोकांची देखील यादीत नावे समाविष्ट करून निवडणुका जिंकल्या याचा आम्ही निषेध करत असून निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे ससाणे यांनी म्हटले. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव दिपाली ससाने म्हणाले की, आमचे नेते खा.राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले परंतु निवडणूक आयोगाच्या ऐवजी भाजपाचे प्रवक्ते उत्तर देताना दिसत आहे त्यामुळे हे स्पष्ट होते की केंद्रातील सरकार हे बोगस मतदानांमुळेच सत्तेवर आले असल्याचे सांगितले.यावेळी सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, सभापती सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले,शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर नगरसेवक दिलीप नागरे,वंदना मुरकुटे, अशोकभाई बागुल, रितेश रोटे, महांता यादव, सौ संगीता मंडलिक, मुन्ना पठाण, के सी शेळके,कलीम कुरेशी, नजीर मुलानी, मार्केट कमिटीचे संचालक राजू चक्रनारायण, राणी देसरडा, अशोकराव बागुल, शंकरराव फरगडे, प्रवीण नवले, रितेश एडके,डॉ. राजेंद्र लोंढे,सरवर अली मास्टर, जावेद शेख, मिथुन शेळके, अशोक जगधने, सुरेश दुबे, सुनील साबळे, रियाज खान पठाण, वैभव पंडित, प्रताप कवडे, अतुल खरात, अमोल आवटे, भैय्या भाई अत्तार, रितेश चव्हाणके,सरबजीत सिंग चुग, शाहरुख शेख, अमोल नाईक, सनी मंडलिक, वैभव कुऱ्हे, जाफर शहा, रजाक पठाण, प्रशांत राऊत, अतिश देसरडा, गणेश काते, कुणाल पाटील, शुभम पाटील, युनूस पटेल, बाबा वायदंडे, शहानवाज बागवान, विशाल साळवे, राजेंद्र भोसले, राजेश जोंधळे, बबलू पठाण, संजय गोसावी, जियान पठाण, तीर्थराज नवले, आकाश जावळे, कल्पेश पाटणी, सागर दुपाटी, प्रशांत आल्हाट, सिमोन चूग, सागर दुपाटी, शिवतेज गोसावी आदी काँग्रेसचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक आयोगाचे घरगड्यासारखे काम-ससाणे
निवडणूक आयोग हे घरगड्यासारखे काम करत असून एकाच नावाचे असंख्य मतदार नोंदवून तसेच हयात व मयत लोकांची देखील यादीत नावे समाविष्ट करून मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी करून बोगस मतदानाला एक प्रकारे प्रोत्साहन दिले.