बेलापूर येथे नवीन पोलीस स्टेशन करा; पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

Belapur Police Station request

बेलापूर व परिसरातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेता, येथील पोलिस दूरक्षेत्राच्या जागी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे करण्यात आली. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-बेलापूर येथे सध्या पोलिस दूरक्षेत्र असून गावाची लोकसंख्या, विस्तार, दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र तसेच हद्दीत वाढत्या गुन्हांची संख्या लक्षात घेता बेलापूर येथे नविन पोलिस स्टेशन कार्यान्वित करावे, अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचेकडे करण्यात आली आहे.


पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी नुकतीच श्रीरामपूरला भेट दिली. त्याप्रसंगी बेलापूर, ऐनतपूर, बेलापूर खुर्द, नर्सरी, वळदगाव, उंबरगाव, एकलहेरे, पढेगाव, उक्कलगाव या गावांचा समावेश होऊन बेलापूर बुद्रूक येथे नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई, अॅड. अरविंद साळवी, महेश कुहे, अभिषेक नवले आ आदी उपस्थित होते. बेलापूर पोलिस दूरक्षेत्र हे सध्या श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला संलग्न आहे. येथे पोलिस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल अशी पदे आहेत. बेलापूर-ऐनतपूर गावाचा विस्तार, दूरक्षेत्राचे कार्यक्षेत्र लक्षात घेता पुरेसे कर्मचारी पोलिस स्टेशन असणे गरजेचे आहे याकडे निवेदनाव्दारे घार्गे यांचे लक्ष वेधण्यात आले.

“पोलीस कर्मचारी व संसाधनांची कमतरता लक्षात घेता, बेलापूरसारख्या वाढत्या गावासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची गरज आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Tags: #BelapurNews #PoliceStationDemand #ShrirampurLive

Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News