लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७...

श्रीरामपूर-
लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. या जागेवर रहिवाशांसाठी अर्धा गुंठा जमीन वाटून त्यांच्या नावे घरकुल बांधले जाणार आहे.या अनुषंगाने भीमनगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उर्वरित जागेत अंगणवाडी करण्यात येणार असून, त्या परिसरात सार्वजनिक शौचालय, नाल्या, काँक्रीट रस्ते, पाणीपुरवठा योजना, विद्युत डीपी, सौरदिवे अशा मूलभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. “विकासकामात कुठेही अडथळा येऊ देणार नाही. आणि जेव्हा ही घरे पूर्ण होतील, तेव्हा मी प्रत्येक कुटुंबासोबत बसून जेवायला येईन,असे भावनिक उद्गार डॉ. विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

लोणी खुर्द गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांसाठी मंजूर ८ कोटींच्या निधीतून अनेक कामांचे भूमिपूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कामांमध्ये शौचालय बांधणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सांडपाणी गटार व्यवस्था, पाझर तलाव दुरुस्ती, रस्ता मजबुतीकरण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते, वॉल कंपाऊंड उभारणी, पाणी फिल्टरेशन प्लांट बसविणे, तसेच बंदिस्त गटार यांचा समावेश आहे.याच कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील यांनी येत्या ऑक्टोबर महिन्यात १२ ते १६ दरम्यान लोणी खुर्द येथे आयोजित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी या निर्णायक विकास टप्प्याचे स्वागत करत डॉ. सुजय विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.

लोणी खुर्द येथील भीमनगर परिसरात आयोजित कार्यक्रमात मा. खा.डॉ.सुजय विखे पाटील.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!