राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना मानाचा ‘धर्म रक्षक पुरस्कार’;शिर्डी येथे महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते बेग यांचा सन्मान*

श्रीरामपूर –अखिल भारतीय हिंदू धर्म परिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘धर्म रक्षक पुरस्कार’ या वर्षीशिवसेनेचे नेते,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग...

श्रीरामपूर –
अखिल भारतीय हिंदू धर्म परिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘धर्म रक्षक पुरस्कार’ या वर्षी
शिवसेनेचे नेते,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे हरियाणा येथील महान तपस्वी महायोगी श्री श्री 1008  महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.अखिल भारतीय हिंदू धर्म परिषद ही सनातन धर्म प्रचार व प्रसार  करणारी देशातील  सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेच्या वतीने हिंदू धर्माचे काम करणारे व्यक्तींना प्रत्येक वर्षी हा मानाचा हिंदू धर्म रक्षक प्रदान केला जातो.यावर्षीचा हा पुरस्कार  कट्टर हिंदुत्वादी नेते म्हणून ओळख असलेले सागर बेग यांना प्रदान करण्यात आला आहे.

‘धर्म रक्षक पुरस्कार’
शिवसेनेचे नेते,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना  महान तपस्वी महायोगी श्री श्री 1008  महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना सागर बेग म्हणाले की,हा पुरस्कार मला  महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हातून मिळाला.त्यामुळे माझी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या कामाची जबाबदारी अजून वाढली आहे.तसेच हा पुरस्कार म्हणजे माझ्या आजवर केलेल्या कामाची पावती आहे,असे मी मानतो.आजवर मी हे काम जितक्या वेगात करत होतो, त्यापेक्षा दुप्पटवेगाने आता मी हे काम करणार आहे.महाराज माझी आपल्याला विनंती आहे की,नुकताच 2006 च्या मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोटाच्या बाबतीत न्यायालयाने सर्व जिहादी आरोपींची सुटका करण्याचा जो दुर्दैवी निर्णय दिला, त्याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. सुटका झालेल्या 12 आरोपींपैकी 5 जणांना सत्र न्यायालयाने फाशीची तर इतर 7 आरोपींना आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.परंतु उच्च न्यायालयाने मात्र त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहे.ही देशासाठी दुर्भाग्यची गोष्ट आहे.आपल्याकडे हिंदू संघटनानांच्या वतीने ही बाब पंतप्रधान यांच्या कानावर घालन्याची विनंती आम्ही करत आहोत. यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव दत्ता खेमनर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!