राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना मानाचा ‘धर्म रक्षक पुरस्कार’;शिर्डी येथे महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते बेग यांचा सन्मान*

श्रीरामपूर –अखिल भारतीय हिंदू धर्म परिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘धर्म रक्षक पुरस्कार’ या वर्षीशिवसेनेचे नेते,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग...

श्रीरामपूर –
अखिल भारतीय हिंदू धर्म परिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘धर्म रक्षक पुरस्कार’ या वर्षी
शिवसेनेचे नेते,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे हरियाणा येथील महान तपस्वी महायोगी श्री श्री 1008  महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.अखिल भारतीय हिंदू धर्म परिषद ही सनातन धर्म प्रचार व प्रसार  करणारी देशातील  सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेच्या वतीने हिंदू धर्माचे काम करणारे व्यक्तींना प्रत्येक वर्षी हा मानाचा हिंदू धर्म रक्षक प्रदान केला जातो.यावर्षीचा हा पुरस्कार  कट्टर हिंदुत्वादी नेते म्हणून ओळख असलेले सागर बेग यांना प्रदान करण्यात आला आहे.

‘धर्म रक्षक पुरस्कार’
शिवसेनेचे नेते,राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना  महान तपस्वी महायोगी श्री श्री 1008  महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना सागर बेग म्हणाले की,हा पुरस्कार मला  महामंडलेश्वर कालिदास बाबा यांच्या हातून मिळाला.त्यामुळे माझी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या कामाची जबाबदारी अजून वाढली आहे.तसेच हा पुरस्कार म्हणजे माझ्या आजवर केलेल्या कामाची पावती आहे,असे मी मानतो.आजवर मी हे काम जितक्या वेगात करत होतो, त्यापेक्षा दुप्पटवेगाने आता मी हे काम करणार आहे.महाराज माझी आपल्याला विनंती आहे की,नुकताच 2006 च्या मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोटाच्या बाबतीत न्यायालयाने सर्व जिहादी आरोपींची सुटका करण्याचा जो दुर्दैवी निर्णय दिला, त्याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. सुटका झालेल्या 12 आरोपींपैकी 5 जणांना सत्र न्यायालयाने फाशीची तर इतर 7 आरोपींना आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.परंतु उच्च न्यायालयाने मात्र त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहे.ही देशासाठी दुर्भाग्यची गोष्ट आहे.आपल्याकडे हिंदू संघटनानांच्या वतीने ही बाब पंतप्रधान यांच्या कानावर घालन्याची विनंती आम्ही करत आहोत. यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव दत्ता खेमनर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!