हल्लेखोरांविरोधात तातडीने कठोर कारवाई करा-राष्ट्रवादी सरचिटणीस आदिक;उक्कलगाव येथे इंद्रनाथ थोरात यांच्या घरी भेट

श्रीरामपूर –
श्रीरामपूर माजी पंचायत समिती सभापती  इंद्रनाथ थोरात यांच्यावर अलीकडेच झालेल्या हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या अमानुष प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी तीव्र संताप व्यक्त करत हल्लेखोरांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उक्कलगाव येथे ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांच्या घरी भेट दिली.त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अविनाश आदिक बोलत होते. यावेळी पंडितराव थोरात,रवींद्र थोरात ,सुनील थोरात,शहाराम शेटे , भागवतराव मुठे,रावसाहेब आदिक, काळे,प्रशांत खंडागळे आदी उपस्थित होते.आदिक पुढे म्हणाले की,इंद्रनाथ थोरात यांच्यावर रस्त्यात अडवून हल्ला करण्यात आला. हे केवळ एका नेत्यावरचे नव्हे तर संपूर्ण सामाजिक सभ्यतेवरचे आक्रमण आहे. अशा घटनांमुळे श्रीरामपूरसारख्या प्रगल्भ व पुरोगामी तालुक्याचे सामाजिक आरोग्य धोक्यात येते आहे.गेल्या काही काळात समाजात अराजकता आणि धक्कादायक घटना घडत आहेत. सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत.सामाजिक स्वास्थ टिकवण्यासाठी पोलिसांनी केवळ घटनांची नोंद न करता, अशा घटना घडूच नयेत यासाठी प्रिव्हेन्शन मोडमध्ये काम केले पाहिजे. या हल्ल्यामागची पार्श्वभूमी, कटकारस्थान, आणि संभाव्य राजकीय दुजाभाव याचा सखोल तपास करणे गरजेचे आहे.अशा प्रवृत्तींना मोकाट सोडल्यास उद्या आणखी गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतील,” असा इशाराही त्यांनी देऊन हल्ल्याचा तपास जलदगतीने करावा, दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आदिक यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांच्या घरी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News