श्रीरामपूर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार-ना.विखे पाटील;श्रीरामपूर एमआयडीसी येथे २२०/३३ के.व्हि. वीज उपकेंद्राचे पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्याला बाभळेश्वर आणि नेवासा तालुक्यातून वीज पुरवठा होतो आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना उच्च दाबाने वीजपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात. आता या वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरची
विजेची अडचण कायमची दूर होऊन तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.शेतकऱ्यांना तसेच श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीला यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर येथील एमआयडीसी येथे सुमारे ५९ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या २२०/३३ के. व्हि उपकेंद्राचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.याप्रसंगी ना.विखे पाटील बोलत होते.या कार्यक्रमास आ.श्री. हेमंत ओगले, मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. सभापती दीपक पटारे,नानासाहेब शिंदे,शदरराव नवले, गिरीधन आसने, संजय फंड,अभिषेक खंडागळे,प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासह पारेषण कंपनीचे वरीष्ठ अधिकारी,उद्योजक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ना.राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन कंपनीच्या वतीने श्रीरामपूर औद्योगिक वसाहत आणि तालुक्यातील गावांना भेडसावणारा वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, म्हणून स्वतंत्र २२०/३३ क्षमतेचे उपकेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या माध्यमातून मंजूर झाले आहे.उपकेंद्रामुळे श्रीरामपूर औद्यगिक वसाहतीमधील उद्योजक, शेतकरी आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.एमआयडीसी मध्ये नव्याने उद्योगधंदे येण्यास त्यामुळे  मदतच होईल जेणेकरून तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.यावेळी आ. हेमंत ओगले म्हणाले की,२२०/३३ के. व्हि उपकेंद्राच्या निर्मितीमुळे श्रीरामपूर विजेच्या बाबतीत समृद्ध होणार असून येणाऱ्या काळात श्रीरामपूर महावितरण कार्यालयाचे विभाजन करून बेलापूर उपकेंद्र मंजूर करावे तसेच महावितरणकडे रिक्त असलेल्या जागा तातडीने भरण्यात याव्यात.

श्रीरामपूर येथील एमआयडीसी येथे २२०/३३ के. व्हि उपकेंद्राचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News