किल्ल्यांची जागतिक वारसास्थळात नोंद शिवप्रेमींसाठी अभिमानाची घटना-ना.विखे पाटील

श्रीरामपूर-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असलेल्या बारा किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद होण्याची ऐतिहासिक घटना संपूर्ण देशाला आणि...

श्रीरामपूर-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असलेल्या बारा किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद होण्याची ऐतिहासिक घटना संपूर्ण देशाला आणि शिवप्रेमीना अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या राज्यातील गड किल्ले ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खरी साक्ष आहे.जाज्वल्य असा शिवकालीन वारसा या किल्ल्याच्या रुपाने आपल्याला लाभणे हे शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे.
आपल्या राज्यातील शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा साल्वेर लोहगड खांदेरी सुवर्णदूर्ण विजयदूर्ग सिंधूदूर्ग जिंजी हे गड युनोस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित करून एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या इतिहासाचा गौरव असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
विश्वनेते पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून युनेस्को मध्ये वीस देशांनी या किल्ल्याच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद व्हावी म्हणून मतदान केले ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची घटना असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील गड किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने विशेष योजना तयार करून किल्याचे पावित्र्य राखण्यासाठी काम सुरू केले आहे.गड किल्ले ही आपली संस्कृती परंपरा जतन करण्यासाठी शासन स्तरावरून सर्व उपाय योजना केल्या जात असताना आता जागतिक वारसा स्थळांमध्ये या किल्ल्याची नोंद झाल्याने किल्याच्या संरक्षणासाठी आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी आता अधिक वाढली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा,साल्वेर, लोहगड, खांदेरी,सुवर्णदूर्ण, विजयदूर्ग,सिंधूदूर्ग, जिंजी हे गड युनोस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!