नवीन मराठी शाळेत 500 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी;रक्तगट तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर-
दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेत महिला मंडळ, श्रीरामपूर यांच्यावतीने रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शैक्षणिक कामासाठी तसेच आपत्कालीन वेळी शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांचा रक्तगट माहीत असणे आवश्यक आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला मंडळ श्रीरामपूर यांच्यावतीने सुमारे 500 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या कामी डॉ.अर्चना सोमानी व त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना रक्तगट माहीत असण्याचे फायदे यावेळी सांगण्यात आले. यावेळी महिला मंडळाच्या प्रमुख विश्वस्त शैलजा वाघमारे, विश्वस्त अनिता जोशी ,ज्येष्ठ सल्लागार डॉ.अंजली आगाशे,अध्यक्षा शितल मुथा उपाध्यक्ष रमा पोफळे, सचिव प्रीती आगाशे, सहसचिव स्मिता जोशी,खजिनदार राणी बाबेल अस्मिता कुलकर्णी, साधना चुडीवाल नीता जगताप, सुनिता मांडण, अनघा देशपांडे, नलिनी देशपांडे उपस्थित होत्या. शिबिरापूर्वी सरस्वती पूजन व स्वर्गीय दादा जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रीती भणगे यांनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन ऋषिकेश जोशी, प्रभारी मुख्याध्यापक भरत शेंगाळ,  मीना जायभाये, स्मिता गोरे, भाग्येश ठाणगे, अनिल गिरमे, मंगल वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विजय दवणे यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक परदेशी यांनी आभार मानले.

दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेत महिला मंडळ, श्रीरामपूर यांच्यावतीने रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News