छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद शिगेला;बेकायदेशीर पुतळा बसवणाऱ्यांवर कारवाई करा-चित्ते;शहराध्यक्ष छाजेड आता शिवाजी चौकात पुतळा बसविणार का?

श्रीरामपूर :छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसविण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी असतानाही शिवाजी महाराजांचा पुतळा भाजी मार्केटमध्ये घाईघाईत बसविण्याचा...

श्रीरामपूर :
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसविण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी असतानाही शिवाजी महाराजांचा पुतळा भाजी मार्केटमध्ये घाईघाईत बसविण्याचा जो प्रयत्न केला गेला तो बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे बेकायदेशीर पुतळा बसविणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, या आशयाचे प्रशासनाला आम्ही लवकरच निवेदन देऊन मागणी करणार असल्याची माहिती भाजपाचे प्रकाश चित्ते यांनी दिली.
प्रकाश चित्ते यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्या पत्रकार परिषदेत भाजपाचे शशिकांत कडूस्कर, राजेंद्र कांबळे, संजय पांडे, सुरेश सोनवणे, अभिजीत कुलकर्णी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री चित्ते म्हणाले की, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाहेरून श्रीरामपूरात पाठवलेले त्यांचे हस्तक यांनी केलेले घाणेरडे व घृणस्पद कृत्य लपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाचा गैरवापर केला जात आहे.त्याचा आम्ही निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच झाला पाहिजे अशी अनेक वर्षापासूनची आमची मागणी होती. पालकमंत्री नामदार विखे व महंत रामगिरी महाराज त्यांच्या हस्ते शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा घाट घालण्यात आला. शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकामध्ये नगरपरिषदेच्या प्रस्तावा नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास बांधकाम विभागाची 1 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रानुसार आधीच परवानगी मिळालेली होती. तरीही मुस्लिम मतांच्या टक्क्यासाठी हा पुतळा शिवाजी चौकात न बसवता नेहरू भाजी मार्केट परिसरात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नेहरू भाजी मार्केटमध्ये जागेत पुतळा बसविण्यात आला तो बेकायदेशीर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसण्याची बांधकाम विभागाची परवानगी असताना ती परवानगी लपविण्यात आली. प्रशासनाने ही परवानगी नाकारून बेकायदेशीरपणे जागेत पुतळा बसविण्यात आला. बेकायदेशीरपणे पुतळा बसविण्यास कारणीभूत असलेल्या सर्वच लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आम्ही प्रशासनाला देणार आहोत. भविष्यात आमची सत्ता आली तर आम्ही हा पुतळा पुन्हा शिवाजी चौकात स्थलांतरित करू असे आश्वासने श्री चित्ते यांनी दिले.
यावेळी बोलताना राजेंद्र कांबळे म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच झाला पाहिजे अशी आमची मागणी ठाम असताना त्यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांनी आम्हाला आवाहन केले होते की जर सार्वजनिक बांधकाम खात्याने परवानगी दिली तर हा पुतळा शिवाजी चौकात बसविण्यास आमचा पाठिंबा राहील.शिवाजी चौकात पुतळा बसविणे बाबत चा सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘ना हरकत’ दाखला आलेला आहे.भाजप शहराध्यक्ष छाजेड यांना आमचे आव्हान आहे की,आता हा पुतळा शिवाजी चौकात तुम्ही बसविणार का? असाही सवाल राजेंद्र कांबळे यांनी शेवटी केला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!