छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद शिगेला;बेकायदेशीर पुतळा बसवणाऱ्यांवर कारवाई करा-चित्ते;शहराध्यक्ष छाजेड आता शिवाजी चौकात पुतळा बसविणार का?

श्रीरामपूर :
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसविण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी असतानाही शिवाजी महाराजांचा पुतळा भाजी मार्केटमध्ये घाईघाईत बसविण्याचा जो प्रयत्न केला गेला तो बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे बेकायदेशीर पुतळा बसविणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, या आशयाचे प्रशासनाला आम्ही लवकरच निवेदन देऊन मागणी करणार असल्याची माहिती भाजपाचे प्रकाश चित्ते यांनी दिली.
प्रकाश चित्ते यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्या पत्रकार परिषदेत भाजपाचे शशिकांत कडूस्कर, राजेंद्र कांबळे, संजय पांडे, सुरेश सोनवणे, अभिजीत कुलकर्णी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री चित्ते म्हणाले की, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाहेरून श्रीरामपूरात पाठवलेले त्यांचे हस्तक यांनी केलेले घाणेरडे व घृणस्पद कृत्य लपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाचा गैरवापर केला जात आहे.त्याचा आम्ही निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच झाला पाहिजे अशी अनेक वर्षापासूनची आमची मागणी होती. पालकमंत्री नामदार विखे व महंत रामगिरी महाराज त्यांच्या हस्ते शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा घाट घालण्यात आला. शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकामध्ये नगरपरिषदेच्या प्रस्तावा नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास बांधकाम विभागाची 1 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रानुसार आधीच परवानगी मिळालेली होती. तरीही मुस्लिम मतांच्या टक्क्यासाठी हा पुतळा शिवाजी चौकात न बसवता नेहरू भाजी मार्केट परिसरात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नेहरू भाजी मार्केटमध्ये जागेत पुतळा बसविण्यात आला तो बेकायदेशीर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसण्याची बांधकाम विभागाची परवानगी असताना ती परवानगी लपविण्यात आली. प्रशासनाने ही परवानगी नाकारून बेकायदेशीरपणे जागेत पुतळा बसविण्यात आला. बेकायदेशीरपणे पुतळा बसविण्यास कारणीभूत असलेल्या सर्वच लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आम्ही प्रशासनाला देणार आहोत. भविष्यात आमची सत्ता आली तर आम्ही हा पुतळा पुन्हा शिवाजी चौकात स्थलांतरित करू असे आश्वासने श्री चित्ते यांनी दिले.
यावेळी बोलताना राजेंद्र कांबळे म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच झाला पाहिजे अशी आमची मागणी ठाम असताना त्यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांनी आम्हाला आवाहन केले होते की जर सार्वजनिक बांधकाम खात्याने परवानगी दिली तर हा पुतळा शिवाजी चौकात बसविण्यास आमचा पाठिंबा राहील.शिवाजी चौकात पुतळा बसविणे बाबत चा सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘ना हरकत’ दाखला आलेला आहे.भाजप शहराध्यक्ष छाजेड यांना आमचे आव्हान आहे की,आता हा पुतळा शिवाजी चौकात तुम्ही बसविणार का? असाही सवाल राजेंद्र कांबळे यांनी शेवटी केला.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News