श्रीरामपूर–
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत आकारी पडीत शेतकऱ्यांची नुकतीच सविस्तर चर्चा झाली.मंत्री महोदयांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत दिनांक 6 मे 2026 रोजी निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई येथे मंत्रालय येथे नुकतीच अकारीपडीत शेतकऱ्यांच्या जमिनी वाटप प्रक्रिया संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली.त्यात जोपर्यंत शेतकऱ्यांना जमिनी वाटप होत नाही आणि त्यांच्या जमिनीची उपलब्धता करून त्या सुरक्षित करून दिली जात नाही तोपर्यंत शासन उरलेली जमीन उद्योगाला देण्यासंदर्भात निर्णय घेणार नाही असे ठरले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकारी पडीत शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या मुळ मालक असलेल्या वारसांना परत करण्यासंदर्भात बुधवार दि.२२ रोजी पालकमंत्री ना.राधाकॄष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.यावेळी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे,शेती महामंडळाचे कार्यकारी संचालक अन्य वरिष्ठ अधिकारी,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, याचिकाकर्ते गिरीधर आसने,माजी सभापती उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे, डॉ शंकर मुठे,भिमभाऊ बांद्रे,शरद आसने यांच्यासह आकारी पडीत नऊ गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.या बैठकीत महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,प्रथम आकारी पडीत शेतकरी बांधवांना जमीन मोजणी करुन दिली जाईल. त्यानंतरच राहीलेली जमीन उद्योगासाठी देण्यात येईल.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
