श्रीरामपूर-
येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु त्या गुन्ह्यामध्ये वाढीव कलमांचा समावेश करावा म्हणून अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून अर्ज द्वारे केली आहे.
दि .16.02.2026 रोजी बाभबळेश्वर राजुरी रोडवर मध्यरात्री जवरे यांना चार चाकी गाडी आडवी लावून पाच अज्ञात हल्लेखोरांनी प्राण घातक हल्ला केला होता त्यामुळे सदरच्या दाखल गुन्ह्यांमध्ये जीवघेणा हल्ला व आज्ञात हल्लेखोर पाच असल्यामुळे संघटित गुन्हेगारी अशा दोन वाढीव कलमांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी जवरे यांनी अर्जात केली आहे.
एफ आय आर दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी संजय विखे यांनी जवरे यांना त्याच दिवशी संध्याकाळी व पुन्हा दुसऱ्या दिवशी घटनास्थळी बोलून दोन साक्षीदार व दोन पंच घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर जवरे यांनी ते तुम्ही बघा, ते तुमचे काम आहे असे म्हटल्यानंतर तपास अधिकारी यांनी राग मनात धरून आपल्या कर्तव्यात कसूर करून फिर्यादी यांच्याशी हुजत घालण्यात सुरुवात केल्याची तक्रार अप्पर पोलीस अधिकारी यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांना सदर प्रकरणातले तपास अधिकारी बदलण्याचे आदेश दिले आहे.घटनेबाबत व अर्जावर चर्चा झाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ जेवढे शक्य असेल तेवढे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यास लोणीच्या पोलीस उपनिरीक्षकांना सांगितले व घटनेचा तपास सायबर विभागामार्फत करणार असल्याचे आश्वासनही जवरे यांना दिले आहे.
