लावणी महोत्सवाने जिंकली रसिकांची मने;पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन

श्रीरामपूर-सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन...

श्रीरामपूर-
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नवमाध्यमातून व्हावी, या उद्देशाने लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2026 लावणी महोत्सव श्रीरामपूर येथे दि. 20 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत खा. गोविंदराव आदिक नाट्यगृह  येथे आयोजित करण्यात आला आहे.या लावणी महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटारे,पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले, सांस्कृतिक कार्य संचालनाचे संभाजीनगर विभागाचे प्रमुख सचिन पाखरराव,लावणी महोत्सव संचालक दादा साळुंके,भाजपा युवामोचाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पटारे,विशाल अंभोरे,लावणी कलापथकाच्या आशा वैशाली नगरकर, श्रद्धा पुणेकर, वैष्णवी कोल्हापूरकर आदी उपस्थित होते.
या महोत्सवात आशा वैशाली नगरकर (नटरंग कला केंद्र, मोडनिंब), श्रद्धा नेहा पुणेकर (लक्ष्मी कला केंद्र, सणसवाडी) आणि वैष्णवी कोल्हापूरकर (रेणुका कला केंद्र, आबंप फाटा वाठार, कोल्हापूर) या कलापथकाने आपली कला सादर करत लावणी रसिकांची मने जिंकली. तसेच 21 फेब्रुवारी रोजी जय अंबिका कला केंद्र (सणसवाडी), अलंकार ग्रुप पार्टी (अलंकार कला केंद्र, सुपा), अपर्णा किर्ती नगरकर आणि रेश्मा वर्षा परितेकर (लक्ष्मी कला केंद्र, सणसवाडी) या संघाने कला सादर केली.दि. 22 फेब्रुवारी रोजी गीता अश्‍विनी वाईकर, रेणुका कला केंद्र (कागल रोड, गोकुळ, शिरगाव), छाया पूजा श्रद्धा कोल्हापूरकर (रेणुका कला केंद्र, आबंप फाटा वाठार, कोल्हापूर) आणि रुक्मिणी, अर्चना, ज्योत्स्ना वाईकर (पिंजरा कलाकेंद्र) हे आपली कला सादर करतील. या लावणी महोत्सवाचा समारोप दि. 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा लावणी महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून श्रीरामपूर येथे होणार्‍या या महोत्सवात सहभागी कलाकार, कलापथके आणि संगीत-नृत्याचा मिलाफ असणार्‍या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालकांनी केले आहे.याप्रसंगी जिल्ह्यासह तालुका व शहरातील लावणी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!