लावणी महोत्सवाने जिंकली रसिकांची मने;पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन

श्रीरामपूर-सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन...

श्रीरामपूर-
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नवमाध्यमातून व्हावी, या उद्देशाने लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2026 लावणी महोत्सव श्रीरामपूर येथे दि. 20 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत खा. गोविंदराव आदिक नाट्यगृह  येथे आयोजित करण्यात आला आहे.या लावणी महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटारे,पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले, सांस्कृतिक कार्य संचालनाचे संभाजीनगर विभागाचे प्रमुख सचिन पाखरराव,लावणी महोत्सव संचालक दादा साळुंके,भाजपा युवामोचाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पटारे,विशाल अंभोरे,लावणी कलापथकाच्या आशा वैशाली नगरकर, श्रद्धा पुणेकर, वैष्णवी कोल्हापूरकर आदी उपस्थित होते.
या महोत्सवात आशा वैशाली नगरकर (नटरंग कला केंद्र, मोडनिंब), श्रद्धा नेहा पुणेकर (लक्ष्मी कला केंद्र, सणसवाडी) आणि वैष्णवी कोल्हापूरकर (रेणुका कला केंद्र, आबंप फाटा वाठार, कोल्हापूर) या कलापथकाने आपली कला सादर करत लावणी रसिकांची मने जिंकली. तसेच 21 फेब्रुवारी रोजी जय अंबिका कला केंद्र (सणसवाडी), अलंकार ग्रुप पार्टी (अलंकार कला केंद्र, सुपा), अपर्णा किर्ती नगरकर आणि रेश्मा वर्षा परितेकर (लक्ष्मी कला केंद्र, सणसवाडी) या संघाने कला सादर केली.दि. 22 फेब्रुवारी रोजी गीता अश्‍विनी वाईकर, रेणुका कला केंद्र (कागल रोड, गोकुळ, शिरगाव), छाया पूजा श्रद्धा कोल्हापूरकर (रेणुका कला केंद्र, आबंप फाटा वाठार, कोल्हापूर) आणि रुक्मिणी, अर्चना, ज्योत्स्ना वाईकर (पिंजरा कलाकेंद्र) हे आपली कला सादर करतील. या लावणी महोत्सवाचा समारोप दि. 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा लावणी महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून श्रीरामपूर येथे होणार्‍या या महोत्सवात सहभागी कलाकार, कलापथके आणि संगीत-नृत्याचा मिलाफ असणार्‍या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालकांनी केले आहे.याप्रसंगी जिल्ह्यासह तालुका व शहरातील लावणी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!