सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांचे ‘झिरो टॉलरन्स’धोरण;३४ जणांविरुध्द हद्दपारीचे प्रस्ताव

श्रीरामपूर-आगामी सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. त्याच्या अनुषंगाने...

श्रीरामपूर-
आगामी सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. त्याच्या अनुषंगाने ३४ जणांविरुद्ध हद्दपारी प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्हयात सराईत गुन्हे करणा-या व्यक्ती टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्हयातील  सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करुन त्यांचे विरुध्द हद्दपारीची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच यापुढेही अशा प्रकारच्या गुन्हेगार व्यक्ती / टोळीची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु असुन त्यांचे विरुध्दही हद्दपारीची कार्यवाही करणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे यांनी सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाया करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनला दिले आहे.त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ मध्ये श्रीरामपुर विभागातील (अहिल्यानगर उत्तर जिल्हा) १७ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील मागील १० वर्षांतील (२०१६ ते २०२५) सर्व गुन्हेगारांचा सविस्तर ‘क्राईम डेटाबेस’ तयार केला आहे.
समाजात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५, ५६ तसेच नवीन फौजदारी कायदयाचे तरतुदी नुसार गुन्हेगारांवर अधिक कडक आणि जलद कारवाई केली जात आहे. क्राईम डेटाबेसमुळे तपासाची गती वाढणार असून, कोणताही आरोपी पोलिसांच्या नजरेतून सुटू शकणार नाही. नवीन कायद्यांमधील तरतुदींचा प्रभावी वापर करून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी हा डेटाबेस ‘कणा’ ठरणार आहे. सदरचा Crime Data हा केवळ एका पोलीस स्टेशन पुरता नसुन पुर्ण अहिल्यानगर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचा गुन्हे रेकॉर्ड यात संकलित केला आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा केल्यास त्याचेवर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करणे शक्य होणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!