रघुनाथ दादा व बच्चू कडुंसह आंदोलक शेतकऱ्यांची नऊ वर्षानंतर निर्दोष मुक्तता

श्रीरामपूर-वडाळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची तोडफोड व अधिकाऱ्यांना काळे फासल्या प्रकरणी आंदोलनकर्ते शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथ पाटील व प्रहार जनशक्ती पक्षाचे...

श्रीरामपूर-
वडाळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची तोडफोड व अधिकाऱ्यांना काळे फासल्या प्रकरणी आंदोलनकर्ते शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथ पाटील व प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयाने नऊ वर्षा नंतर निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,यांच्यासह शेतकरी व संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर भारतीय दंड विधान कलम ३५३,१४३,१४७, १४९व ४२७ अन्वय गुन्हे दाखल झाले होते. सदर प्रकरणी येथील न्यायालयात सात वर्ष खटला चालला.अखेर श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ साळवे यांनी सदर खटला काल निकाली काढून सर्व आंदोलक नेत्यांची व शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. एफ आय आर नंबर ९७/२०१७ सेशन केस नंबर ८२/२०१९ नुसार आंदोलनकर्ते रघुनाथ पाटील,बच्चू कडू,कालिदास आपेट,रुपेंद्र काले,बाळासाहेब पटारे, अनिल औताडे,अजय बारस्कर, युवराज जगताप, विलास कदम यांच्यासह डॉ.शंकर मुठे, भाऊसाहेब मुठे , शिवाजी मुठे, भिकचंद मुठे, चांगदेव मुठे, रमेश मुठे, रघुनाथ मुठे, पाराजी शिंदे, भास्कर शिंदे यांच्यासह इतर शंभर शेतकऱ्यांसाठी सदर खटला चालविण्यासाठी श्रीरामपूर बारचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. संदीप चोरमल, ॲड. बाबासाहेब मुठे, ॲड सर्जेराव घोडे, ॲड. प्रशांत कापसे यांनी विना मोबदला आंदोलकांच्या केसेस चालविल्या.
सन 2017 मध्ये रघुनाथ दादा पाटील व बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी तसेच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा यासाठी सीएम नागपूर (फडणवीस) टु पीएम वडनगर गुजरात (मोदी) अशी आसूड यात्रा काढण्यात आली होती.सदर कार्यक्रमांमध्ये श्रीरामपूर येथे एनडी शाखेच्या शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यामुळे आदल्या दिवशी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या समवेत मुठेवाडगावच्या शेतकऱ्यांनी वडाळा पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन पाणी मिळण्याची मागणी केली होती.दरम्यान श्रीरामपूर येथून सदर आसूड यात्रा कोपरगावच्या दिशेने जात असताना
वडाळा पाटबंधारे विभागाच्या अज्ञात लोकांनी कार्यालयावर आंदोलन केले.परंतु पोलीस प्रशासनाने संघर्ष यात्रेतील नेते, आयोजक व निवेदन दिलेल्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते.त्यातून या सर्व आंदोलकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
श्रीरामपूर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्रातून (सांगली) व विदर्भातून (अमरावती) येथून येत शेतकरी संघटनेच्या व प्रहारच्या नेत्यांना नऊ वर्ष न्यायालयीन संघर्ष करावा लागतो लागतो. ही तालुक्यातील सत्तेत असलेल्या राजकीय नेत्यांच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांच्या बाबत असंवेदनशील बाब असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी म्हटले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!