श्रमसंस्कार शिबिरातून शिस्त,सेवा,नेतृत्वाची शिकवण- माजी आ.मुरकुटे

श्रीरामपूर-अशोक कारखान्याच्या माध्यमातून सुरू केलेल्या शिक्षण संस्थांमधून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घडले असून, आज ते विविध क्षेत्रांत मोठ्या व जबाबदारीच्या पदांवर...

श्रीरामपूर-
अशोक कारखान्याच्या माध्यमातून सुरू केलेल्या शिक्षण संस्थांमधून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घडले असून, आज ते विविध क्षेत्रांत मोठ्या व जबाबदारीच्या पदांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार शिबिरातुन व सामुदायिक कार्यातून शिस्त,नेतृत्व,सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्व विकासाची शिकवण मिळते, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन,माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अशोकनगर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्‌घाटन गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी गोरक्षनाथ मंदिर खोकर येथे मुरकुटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी खोकर देवस्थानचे ह.भ.प.ओमकार महाराज शिंदे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव सोपानराव राऊत,सहसचिव विरेश गलांडे, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी व्हा.चेअरमन बाबासाहेब काळे, संचालक निरज मुरकुटे, शंकरराव शेरकर,मार्केट कमिटी सदस्य राजू चक्रनारायण,पोलीस पाटील डॉ.अनिकेत चव्हाण,खोकर गावच्या सरपंच आशाताई चक्रनारायण,डॉ.तेजश्री तोरणे मॅडम, जगन्नाथ वाघचौरे,भाऊसाहेब सिन्नरकर,ज्ञानदेव सलालकर,विठ्ठलराव  शेरकर, रमेश थोरात,योगेश काळे,रामचंद्र शेरकर,रावसाहेब चक्रनारायण, रविंद्र पटारे,ज्ञानदेव पवार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
  माजी आमदार मुरकुटे पुढे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मदत केली पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.स्वयंसेवकांमध्ये समाजाबद्दलची जबाबदारीची भावना निर्माण झाली पाहिजे.नेतृत्वगुण, संवाद कौशल्य संघकार्य आणि लोकशाही मूल्यांची शिकवण मिळाली पाहिजे.नैसर्गिक आपत्तींसारख्या परिस्थितीत मदत व पुनर्वसनाचे काम केले पाहिजे.विविध भागातील लोकांशी संवाद साधून राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचे काम स्वयंमसेवकांनी केले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,स्वयंमशिस्त आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा नेमका काय उद्देश असतो हे त्यांनी सांगितले तर संचालक निरज मुरकुटे यांनी काम करताना विद्यार्थ्यांनी कोणतीही लाज न बाळगता काम केले पाहिजे मी ऑस्ट्रेलियात असतानी माझी सर्व कामे मी स्वतः करत होतो. कामामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीन विकास होतो असे मत त्यांनी व्यक्त केले.ह.भ.प.ओकामर महाराज शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केल ते म्हणाले,विद्यार्थ्यांनी जीवनात प्रामाणिक राहून देश सेवा आणि समाज सेवा केली पाहीजे. मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.दिलीप खंडागळे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.राणी पटारे यांनी केले.कार्यक्रमासाठी
महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दिलीप खंडागळे,प्रा.संगीता खंडिझोड,उपप्रचार्य सुयोग थोरात,प्रा.सुधीर शेरकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका तसेच कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब पटारे,शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी आणि खोकर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!