श्रीरामपूर-
अशोक कारखान्याच्या माध्यमातून सुरू केलेल्या शिक्षण संस्थांमधून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी घडले असून, आज ते विविध क्षेत्रांत मोठ्या व जबाबदारीच्या पदांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार शिबिरातुन व सामुदायिक कार्यातून शिस्त,नेतृत्व,सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्व विकासाची शिकवण मिळते, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन,माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अशोकनगर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी गोरक्षनाथ मंदिर खोकर येथे मुरकुटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी खोकर देवस्थानचे ह.भ.प.ओमकार महाराज शिंदे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव सोपानराव राऊत,सहसचिव विरेश गलांडे, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी व्हा.चेअरमन बाबासाहेब काळे, संचालक निरज मुरकुटे, शंकरराव शेरकर,मार्केट कमिटी सदस्य राजू चक्रनारायण,पोलीस पाटील डॉ.अनिकेत चव्हाण,खोकर गावच्या सरपंच आशाताई चक्रनारायण,डॉ.तेजश्री तोरणे मॅडम, जगन्नाथ वाघचौरे,भाऊसाहेब सिन्नरकर,ज्ञानदेव सलालकर,विठ्ठलराव शेरकर, रमेश थोरात,योगेश काळे,रामचंद्र शेरकर,रावसाहेब चक्रनारायण, रविंद्र पटारे,ज्ञानदेव पवार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार मुरकुटे पुढे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मदत केली पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.स्वयंसेवकांमध्ये समाजाबद्दलची जबाबदारीची भावना निर्माण झाली पाहिजे.नेतृत्वगुण, संवाद कौशल्य संघकार्य आणि लोकशाही मूल्यांची शिकवण मिळाली पाहिजे.नैसर्गिक आपत्तींसारख्या परिस्थितीत मदत व पुनर्वसनाचे काम केले पाहिजे.विविध भागातील लोकांशी संवाद साधून राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचे काम स्वयंमसेवकांनी केले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,स्वयंमशिस्त आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा नेमका काय उद्देश असतो हे त्यांनी सांगितले तर संचालक निरज मुरकुटे यांनी काम करताना विद्यार्थ्यांनी कोणतीही लाज न बाळगता काम केले पाहिजे मी ऑस्ट्रेलियात असतानी माझी सर्व कामे मी स्वतः करत होतो. कामामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीन विकास होतो असे मत त्यांनी व्यक्त केले.ह.भ.प.ओकामर महाराज शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केल ते म्हणाले,विद्यार्थ्यांनी जीवनात प्रामाणिक राहून देश सेवा आणि समाज सेवा केली पाहीजे. मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.दिलीप खंडागळे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.राणी पटारे यांनी केले.कार्यक्रमासाठी
महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दिलीप खंडागळे,प्रा.संगीता खंडिझोड,उपप्रचार्य सुयोग थोरात,प्रा.सुधीर शेरकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका तसेच कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब पटारे,शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी आणि खोकर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
