रब्बीच्या दोन आवर्तनाचे नियोजन तात्काळ करा;शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष औताडे

श्रीरामपूर-भंडारदरा सिंचन प्रणालीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस, कांदा, गहू ,मका अशा सर्वच बागायती पिकांची लागवड 80 टक्के पूर्ण झालेली आहे.त्यासाठी मोठ्या...

श्रीरामपूर-
भंडारदरा सिंचन प्रणालीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस, कांदा, गहू ,मका अशा सर्वच बागायती पिकांची लागवड 80 टक्के पूर्ण झालेली आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विहिरी व बोअरचा उपसा सिंचनासाठी होत असल्याने भुजल पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी दोन आवर्तनांचे नियोजन करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की,आवर्तन कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांकडून नमुना नंबर 7 चे पाणी अर्ज कालवा निरीक्षकांनी भरून घेण्यासाठी विभागाने सूचना कराव्यात.जलसंपदा विभागाने थकबाकी अभावी कुठल्याही शेतकऱ्यांचे पाणी अर्ज नाकारू नयेत.यावर्षी खरीपामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे तसेच भंडारदरा सिंचन प्रणाली कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती पिके नुकसानीमुळे बाधित झालेले आहेत.श्रीरामपूर तालुक्यातील कॅनॉलच्या चाऱ्यांच्या परिसरातील पाणी पातळी खालावली आहे. मध्यंतरी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोन तीन तीन दिवस पिण्याचे आवर्तने घेतल्यामुळे कॅनॉलच्या परिसरातील पाण्याची परिस्थिती पंधरा-वीस दिवस पुढे ढकलण्यासारखी असली तरी कॅनॉल पासून अंतरावर असलेल्या भागांमध्ये पाणी पातळी खालवली आहे.आज रोजी धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा असून  पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून तात्काळ आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत असल्याचे जिल्हाध्यक्ष औताडे यांनी म्हटले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!