श्रीरामपूर-
नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हा विभाजनाचा प्रश्न उपस्थित करुन श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा,अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.
यावेळी सभागृहात बोलताना आ. ओगले म्हणाले की, अहिल्यानगर हा भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असून जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे. नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करता श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे ठिकाण आहे. श्रीरामपूरमध्ये सर्वच महत्त्वाची शासकीय कार्यालय त्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगररचना कार्यालय असे महत्त्वाचे सर्वच कार्यलय श्रीरामपूर मध्ये आहे. त्याच बरोबर आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी श्रीरामपूर मध्ये आहे तसेच शेती महामंडळाच्या जागा देखिल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही जुनी मागणी आहे. त्यामूळे श्रीरामपूर हेच जिल्हा मुख्यालयाचे योग्य ठिकाण आसल्याचे ओगले यांनी म्हटले आहे.
विधानसभेच्या निवडणुकी नंतर पहिल्या दिवसांपासूनच आ. हेमंत ओगले हे श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या सर्व ठिकाणीं आ. ओगले हे श्रीरामपूर जिल्हाची मागणी करतांना दिसत आहे.
