प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांनी घेतली राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक


श्रीरामपूर : आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत पाटील यांनी नुकतीच तालुक्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीसाठी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, निवासी नायब तहसीलदार राजेश पऊळ, निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, उपमुख्याधिकारी महेंद्र तापकिरे, महसूल सहायक उत्तम रासकर, ओम खुपसे, संदीप पाळंदे, नगरपरिषदेचे लिपिक अरुण लांडे उपस्थित होते.

यावेळी निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया आहे. सर्व पक्षांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि निष्पक्षपणे पार पाडावी असे सावंत-पाटील यांनी सांगितले. त्यांनी मतदान केंद्रांवर गोंधळ टाळण्यासाठी आणि मतदारांना त्रास होऊ नये यासाठी पक्षांनी ‘बूथ लेवल एजंट’ची नेमणूक करावी असे आवाहन केले. १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर २०२४ या तारखेस १८ वय वर्ष पुर्ण होणारे व झालेल्या व्यक्तींना मतदार नोंदणी करता येणार आहे. प्रतिष्टीत मतदार, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, वकील, इंजिनियर, दिव्यांग आदी मतदारांची नावे मतदार यादीत तपासा. याकामी काही अडचण असल्यास तत्काळ निवडणूक शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांनी केले.

या बैठकीला काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इतर स्थानिक पक्ष व आघाडीचेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पक्षांनी निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. काही पक्षांनी मतदार यादीतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले, ज्यावर प्रांताधिकारी यांनी तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.
=======  

१) तहसीलदारांचे आवाहन
“निवडणूक प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्वांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया यशस्वी करूया. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा अनुभव आणि प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यशस्वी पार पाडू.”
– मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर
========
  २) प्रांत व तहसीलदारांचे कौतुक
लोकसभा व विधानसभा निवडणुका प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ या राम-लक्ष्मण जोडीच्या कुशल नेतृत्वाखाली निवडणूक यंत्रणेने उत्तम काम केल्यामुळे चांगल्या प्रकारे पार पडले. यावेळी कोणतीही तक्रार अथवा अडचण आली नाही. त्यामुळे श्रीरामपूर मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असे गौरव उद्गार राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काढले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News