प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांनी घेतली राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

श्रीरामपूर : आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत पाटील...


श्रीरामपूर : आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत पाटील यांनी नुकतीच तालुक्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीसाठी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, निवासी नायब तहसीलदार राजेश पऊळ, निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, उपमुख्याधिकारी महेंद्र तापकिरे, महसूल सहायक उत्तम रासकर, ओम खुपसे, संदीप पाळंदे, नगरपरिषदेचे लिपिक अरुण लांडे उपस्थित होते.

यावेळी निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया आहे. सर्व पक्षांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि निष्पक्षपणे पार पाडावी असे सावंत-पाटील यांनी सांगितले. त्यांनी मतदान केंद्रांवर गोंधळ टाळण्यासाठी आणि मतदारांना त्रास होऊ नये यासाठी पक्षांनी ‘बूथ लेवल एजंट’ची नेमणूक करावी असे आवाहन केले. १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर २०२४ या तारखेस १८ वय वर्ष पुर्ण होणारे व झालेल्या व्यक्तींना मतदार नोंदणी करता येणार आहे. प्रतिष्टीत मतदार, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, वकील, इंजिनियर, दिव्यांग आदी मतदारांची नावे मतदार यादीत तपासा. याकामी काही अडचण असल्यास तत्काळ निवडणूक शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांनी केले.

या बैठकीला काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इतर स्थानिक पक्ष व आघाडीचेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पक्षांनी निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. काही पक्षांनी मतदार यादीतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले, ज्यावर प्रांताधिकारी यांनी तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.
=======  

१) तहसीलदारांचे आवाहन
“निवडणूक प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्वांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया यशस्वी करूया. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा अनुभव आणि प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यशस्वी पार पाडू.”
– मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर
========
  २) प्रांत व तहसीलदारांचे कौतुक
लोकसभा व विधानसभा निवडणुका प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ या राम-लक्ष्मण जोडीच्या कुशल नेतृत्वाखाली निवडणूक यंत्रणेने उत्तम काम केल्यामुळे चांगल्या प्रकारे पार पडले. यावेळी कोणतीही तक्रार अथवा अडचण आली नाही. त्यामुळे श्रीरामपूर मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असे गौरव उद्गार राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काढले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!