शिवरायांचा अवमान अन ‘त्यांच्या’कडून आत्मक्लेश,याचे आश्चर्य वाटते-पालकमंत्री विखे पाटील यांनी फटकारले

श्रीरामपुर-श्रीरामपूरात काँग्रेसचे स्थानिक पुढारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याचे समर्थन करीत आहेत.महाराजांचा अवमान झाल्यानंतर ते आत्मक्लेश आंदोलन करतात, याचे मला आश्चर्य...

श्रीरामपुर-
श्रीरामपूरात काँग्रेसचे स्थानिक पुढारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याचे समर्थन करीत आहेत.महाराजांचा अवमान झाल्यानंतर ते आत्मक्लेश आंदोलन करतात, याचे मला आश्चर्य वाटते.त्यांना मनाची नाही तर जनाची तरी लाज वाटायला हवी.इतका निर्लज्जपणा मी आजवरच्या राजकारणा त कधी पहिला नाही,अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फटकारले.
विखे पाटील श्रीरामपुरात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,आपणावर जिल्ह्यात वातावरण बिघडवण्याचा होत असलेला आरोप पोरकटपणाचा असून विरोधकांना जिल्ह्यात सर्वत्र पराभव दिसत असल्याने आपल्यावर असे आरोप केले जात आहेत.
विरोधकांकडे आज कुठलेही काम राहिलेले नाही.केवळ टीकाटिप्पणी करणे हा एकमेव उद्योग त्यांचा सुरू आहे.श्रीरामपूर मध्ये भाजप-राष्ट्रवादी युतीला जनतेचे पाठबळ मिळत आहे. स्वाभाविकच त्यामुळे विरोधकांची चिडचिड सुरू आहे.त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे माझ्यावर ते टीका करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.त्यांचा अवमान झाल्यामुळे त्याची प्रतिक्रिया जनतेतुन उमटली.याउलट देशपातळीवर असलेली काँग्रेसच्या नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी जनतेसमोर आली.बिहार राज्याच्या निवडणुकांनी ते स्पष्ट केले. आज जिल्ह्यात संगमनेरमध्ये काँग्रेसचे मोठे नेते निवडणूकित पक्षाचे चिन्ह घ्यायला तयार नाहीत.ही मोठी शोकांतिका आहे.याचा अर्थ पक्ष संपुष्टात आलेला आहे.आता हा पक्ष फक्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपुरता राहतो की काय अशी शंका यायला लागली आहे.

श्रीरामपूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!