भाजप-राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी श्रीनिवास बिहाणी रिंगणात; शिवसेनेची चित्ते तर उबाठाची थोरे यांना उमेदवारी;नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा सस्पेन्स अखेर संपला असून काँग्रेसच्या करण ससाणे यांच्या विरोधात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा सस्पेन्स अखेर संपला असून काँग्रेसच्या करण ससाणे यांच्या विरोधात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांना रिंगणात उतरवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश चित्ते हे तर उबाठा सेनेकडून अशोक थोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीची आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी औपचारिक घोषणा करण्यात आली.यात भाजप २२ तर राष्ट्रवादी १२ नगरसेवक पदावर निवडणूक लढणार आहे.शिवसेना शिंदे गटाने अखेर महायुतीपासून पूर्णपणे फारकत घेतली आहे.

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस,भाजप,उबाठा, शिंदे सेना यांच्या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष व बसपाही निवडणूकीच्या रणांगणात उतरले आहेत.
शिंदे सेनेकडून इतर पक्षात उमेदवारी न मिळालेल्यांना शेवटच्या क्षणी आपल्या पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आल्याने त्यांनी सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत.शिंदे सेनेकडून प्रकाश चित्ते आणि दिपाली चित्ते यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सून मंजूश्री मुरकुटे (प्रभाग ११) यांच्यासह सागर बेग यांच्या समर्थकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
काँग्रेस कडून ससाणे गटाने सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासह नगरसेवकांच्या उमेदवारीची यादी अंतिम केलेली असल्याने त्यांची मोर्चेबांधणी आधीच पूर्ण होती. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये युतीचा ‘फॉर्म्युला’ उशिरा ठरल्याने अनेक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. भाजपने राष्ट्रवादीला मुस्लिम बहुल प्रभागांसह १२ जागा दिल्या. माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रभाग ३ मधून नगरसेवक पदासाठी अर्ज भरला आहे.

४० वर्षे काही केलं नाही आता काय करणार?-डॉ. विखे पाटील
शिंदे शिवसेनेना सतत आपली भूमिका बदलत राहील्याने आम्ही अखेर त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. श्रीरामपूरला विकासात्मक चेहरा हवा आहे. श्रीरामपूरला यापूर्वी प्रत्येक निवडणुक जातीय समिकरनांवर लढवली गेली.आमचा मात्र कुठल्याही जातिय समिकरणावर विश्वास नाही. ४० वर्षे जे काही करू शकले नाहीत ते आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार होऊन काय करणार? असा सवालही मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.

भाजप–राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवू-आदिक
पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मा खा.डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत युतीची चर्चा पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादीला १२ जागा आणि अध्यक्षपदासह भाजपला २२ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना युतीपासून बाजूला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जावू,असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!