शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद घालणे नतद्रष्टपणा-पालकमंत्री विखे पाटील;अलघ,डावखर,गुलाटी यांसह अनेकांचा भाजपत प्रवेश

श्रीरामपूर-छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद घालणे हाच नतद्रष्टपणा होता.राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर...

श्रीरामपूर-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद घालणे हाच नतद्रष्टपणा होता.राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेही भव्य  स्मारक उभे राहील.येत्या सहा महीन्यात विकास प्रक्रीयेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अशोक बॅकेचे माजी चेअरमन नारायणराव डावखर, पहील्या माजी नगराध्यक्षा इंदूमती डावखर,गजेंद्र डावखर, रवि गुलाटी, हेमा गुलाटी,राजेश अलग यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे  सर्वाचे स्वागत करून अभिनंदन केले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,दिलीप भालसिंग,दिपक पटारे,संजय फंड,आशिष धनवटे श्रीनिवास बिहाणी जितेंद्र छाजेड बाबासाहेब चेडे केतन खोरे रवी पाटील स्वाती चव्हाण पुष्पाताई हरदास शरद नवले नानासाहेब शिंदे गिरीधर आसने आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पक्ष संघटनेला महत्व आहे.सर्वाच्या पाठीशी पक्षाची ताकद असल्यामुळे प्रतयेकजण इथे मोठा आहे.व्यक्तिला  नाही तर  संघटनेला महत्व असल्याचे सांगून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वाच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की चाळीस वर्षे लागली.मात्र महायुती सरकार आल्यामुळे स्मारकाचे स्वप्न पूर्ण होवू शकले.अनेक वर्ष फक्त जागेवरून वाद झाले.महाराजांच्या स्मारकावरून वाद होणे हाच  नतद्रष्ट पणा असल्याचा उल्लेख केला.

श्रीरामपूर शहारातील नाॅर्दनब्रॅच कालव्याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले असून येत्या सहा महीन्यात विकासाच्या माध्यामातून शहराचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भाररत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी यापुर्वीच मंजूर झाला असून भव्य स्मारक लवकर उभे राहील.
दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदी मराठी गाण्याची मैफल आयोजित करण्यात आली होती.यातील काही कलाकार संगमनेचे असल्याचा उल्लेख करून संगमनेरात फार चांगले कलाकार असल्याचा मिश्कील टिपणी करून  स्नेहमिलन कार्यक्रमात आज मिसळ संगमनेरची आणि पाव लोणीचे असल्याचे उल्लेख केला.कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते विविध संस्थां संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक आजी माजी नगरसेवकांनी भाजपत जाहीर प्रवेश केला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!