श्रीरामपूर-
श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा शिवाजी चौकात न बसवता भाजीमंडई समोर बसवून त्याबाबतचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित केला आहे.त्याचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख सचिन बदढे यांनी आत्मक्लेष आंदोलनाचे आयोजन केले होते.
यावेळी शिवप्रेमीसह श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर,सभापती सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे,डॉ. वंदना मुरकुटे, अण्णासाहेब डावखर, रमेश कोठारी, राजेंद्र सोनवणे, लकी सेठी, दिलीप नागरे, अहमदभाई जागीरदार, पंडितमामा बोंबले, अशोक उपाध्ये, समिन बागबान, तिलक डूगरवाल उपस्थित होते.यावेळी नगरपालिकेतील महाराजांच्या पुतळ्यासमोर मौन पाळत आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे म्हणाले की,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण दोन तारखेला भाजी मंडई या ठिकाणी होणार आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात आम्ही बसवू शकलो नाही, त्यासाठी आम्ही श्रीरामपूरकर कमी पडलो म्हणून छत्रपती शिवरायांची माफी मागून एक तारखेला सकाळी नगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर माफी मागून आत्मक्लेश आंदोलन शिवसेना व शिवप्रेमी यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी दिली. या आंदोलनात सर्व शिवप्रेमी, शिवसैनिक व श्रीरामपुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभेच्या वेळी स्वतः परमपूज्यनीय रामगिरी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी रोड या ठिकाणी चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा भूमिपूजन झाले होते. मग ते काय फक्त खासदारकी पुरते होते की काय? त्यानंतर आज पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजी मंडई या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे.ते पण पूर्ण राजकीय असून जनभावनेचा जी मागणी आहे त्याला पूर्ण विरोध करून फक्त बहुमताच्या आणि सत्तेच्या जोरावर भाजी मंडई या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होत आहे.हा सर्व जनतेच्या भावनेचा खेळवाड आहे.
स्वर्गीय जयंतराव ससाणे यांनी भाजी मंडई या ठिकाणी त्याचवेळी परमिशन दिली होती पण जनभावना त्या ठिकाणी पुतळा बसवण्यास अनुकूल नव्हती त्यामुळे त्यांनी कधीही तो निर्णय जनतेवर लादला नाही सर्व गोष्टी जनतेच्या समोर याव्या आणि शिवप्रेमींना याची माहिती व्हावी म्हणूनच आम्ही सर्वांनी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी दिली.याप्रसंगी शिवसेना उप जिल्हाप्रमुख सचिन बडदे ,निखिल पवार, एकनाथ गुलदगड ,रामा सुधिर वायखिंदे,अग्रवाल, ,राहुल रणधीर, रमेश घुले ,सागर हरके ,प्रवीण शिंदे, सुरेश बारस्कर,दिनेश पोपळघट, राधाकिसन डांगे ,मच्छिंद्र वाणी, कैलास पुजारी, अतुल शेटे, सुधीर वायखिंडे, आयज तांबोळी , रज्जाक पठाण सौ शारदाताई कदम, रूपालीताई सौदागर, सौ अनुराधाताई आहेर आदी उपस्थित होते.
