आ.ओगले, ससाणे, बडदेंसह अनेकांचा आत्मक्लेष;’महाराज माफी आसावी’ म्हणत आंदोलन

श्रीरामपूर-श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा शिवाजी चौकात न बसवता भाजीमंडई समोर बसवून त्याबाबतचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित केला आहे.त्याचा...

श्रीरामपूर-
श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा शिवाजी चौकात न बसवता भाजीमंडई समोर बसवून त्याबाबतचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित केला आहे.त्याचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख सचिन बदढे यांनी आत्मक्लेष आंदोलनाचे आयोजन केले होते.
यावेळी शिवप्रेमीसह श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर,सभापती सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे,डॉ. वंदना मुरकुटे, अण्णासाहेब डावखर, रमेश कोठारी, राजेंद्र सोनवणे, लकी सेठी, दिलीप नागरे, अहमदभाई जागीरदार, पंडितमामा बोंबले, अशोक उपाध्ये, समिन बागबान, तिलक डूगरवाल उपस्थित होते.यावेळी नगरपालिकेतील महाराजांच्या पुतळ्यासमोर मौन पाळत आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे म्हणाले की,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण दोन तारखेला भाजी मंडई या ठिकाणी होणार आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात आम्ही बसवू शकलो नाही, त्यासाठी आम्ही श्रीरामपूरकर कमी पडलो म्हणून छत्रपती शिवरायांची माफी मागून एक तारखेला सकाळी नगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर माफी मागून आत्मक्लेश आंदोलन शिवसेना व शिवप्रेमी यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी दिली. या आंदोलनात सर्व शिवप्रेमी, शिवसैनिक व श्रीरामपुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभेच्या वेळी स्वतः परमपूज्यनीय रामगिरी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी रोड या ठिकाणी चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा भूमिपूजन झाले होते. मग ते काय फक्त खासदारकी पुरते होते की काय? त्यानंतर आज पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजी मंडई या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे.ते पण पूर्ण राजकीय असून जनभावनेचा जी मागणी आहे त्याला पूर्ण विरोध करून फक्त बहुमताच्या आणि सत्तेच्या जोरावर भाजी मंडई या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होत आहे.हा सर्व जनतेच्या भावनेचा खेळवाड आहे.

स्वर्गीय जयंतराव ससाणे यांनी भाजी मंडई या ठिकाणी त्याचवेळी परमिशन दिली होती पण जनभावना त्या ठिकाणी पुतळा बसवण्यास अनुकूल नव्हती त्यामुळे त्यांनी कधीही तो निर्णय जनतेवर लादला नाही सर्व गोष्टी जनतेच्या समोर याव्या आणि शिवप्रेमींना याची माहिती व्हावी म्हणूनच आम्ही सर्वांनी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी दिली.याप्रसंगी  शिवसेना उप जिल्हाप्रमुख सचिन बडदे ,निखिल पवार, एकनाथ गुलदगड ,रामा सुधिर वायखिंदे,अग्रवाल,  ,राहुल रणधीर, रमेश घुले ,सागर हरके ,प्रवीण शिंदे, सुरेश बारस्कर,दिनेश पोपळघट, राधाकिसन डांगे ,मच्छिंद्र वाणी, कैलास पुजारी, अतुल शेटे, सुधीर वायखिंडे, आयज तांबोळी , रज्जाक पठाण सौ शारदाताई कदम, रूपालीताई सौदागर, सौ अनुराधाताई आहेर आदी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!