ई केवायसी बंद असल्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित-जवरे

श्रीरामपूर-संपूर्ण राज्यभरात नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचे संपूर्णतः शेत पिकाचे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी मदत जाहीर केली आहे. परंतु...

श्रीरामपूर-
संपूर्ण राज्यभरात नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचे संपूर्णतः शेत पिकाचे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी मदत जाहीर केली आहे. परंतु पंचनामासाठी लागणारी ई केवायसी प्रणाली बंद असल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहे तरी शासनाने तात्काळ ई केवायसी सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
चालू खरीप हंगामामध्ये परतीच्या मान्सूनने अतिरिक्त पर्जन्यवृष्टी झाल्याने खरीप हंगामाचे पूर्णपणे नुकसान झाले होते शासनाने नुकसान भरपाई म्हणून 31 हजार 628 कोटी मदतीसाठी आढावा म्हणून तात्काळ मदत शेतकऱ्यांना जाहीर केली होती दिवाळीपर्यंत काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत ही मिळाली परंतु त्यानंतर शासनाने पंचनामेसाठी इ केवायसी प्रणाली अट असल्यामुळे शासनाच्या वेबसाईटवरील इ केवायसी प्रणाली बंद असल्यामुळे संबंधित तहसील कार्यालयाकडून पंचनामे केले गेल्याच्या याद्या पुन्हा तलाठी कार्यालयांकडे माघारी पाठवण्यात आले आहे
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिकाला शासनाने सर्वप्रथम दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यासाठी शासन आदेश काढले होते त्यामध्ये वाढ करून मर्यादा तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची दोन किंवा तीन वेगवेगळ्या गावांमध्ये जमीन असल्याने, आधार क्रमांक एकच असल्याने, इकेवायसी अपूर्ण , असल्याने आधार क्रमांक चुकीचा असल्याने, अशा वेगवेगळ्या त्रुटी दाखवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शासनाने पंचनामाचे प्रस्ताव पुन्हा माघारी तलाठी कार्यालयांकडे पाठवले असल्यानेशेतकरी मदतीपासून वंचित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना  तात्काळ मदत मिळावी म्हणून शासन स्तरावर त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे शिवाजी जवरे , राजेंद्र उंडे, एडवोकेट सर्जेराव घोडे, किसन काकडे , साहेबराव चोरमल , शरद पवार राजेंद्र गोरे , बबनराव उघडे, ईश्वर दरंदले, शरद पठारे, ज्ञानदेव पठारे, आदींनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!