श्रीरामपूर-
संपूर्ण राज्यभरात नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचे संपूर्णतः शेत पिकाचे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी मदत जाहीर केली आहे. परंतु पंचनामासाठी लागणारी ई केवायसी प्रणाली बंद असल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहे तरी शासनाने तात्काळ ई केवायसी सुरू करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
चालू खरीप हंगामामध्ये परतीच्या मान्सूनने अतिरिक्त पर्जन्यवृष्टी झाल्याने खरीप हंगामाचे पूर्णपणे नुकसान झाले होते शासनाने नुकसान भरपाई म्हणून 31 हजार 628 कोटी मदतीसाठी आढावा म्हणून तात्काळ मदत शेतकऱ्यांना जाहीर केली होती दिवाळीपर्यंत काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत ही मिळाली परंतु त्यानंतर शासनाने पंचनामेसाठी इ केवायसी प्रणाली अट असल्यामुळे शासनाच्या वेबसाईटवरील इ केवायसी प्रणाली बंद असल्यामुळे संबंधित तहसील कार्यालयाकडून पंचनामे केले गेल्याच्या याद्या पुन्हा तलाठी कार्यालयांकडे माघारी पाठवण्यात आले आहे
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिकाला शासनाने सर्वप्रथम दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यासाठी शासन आदेश काढले होते त्यामध्ये वाढ करून मर्यादा तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची दोन किंवा तीन वेगवेगळ्या गावांमध्ये जमीन असल्याने, आधार क्रमांक एकच असल्याने, इकेवायसी अपूर्ण , असल्याने आधार क्रमांक चुकीचा असल्याने, अशा वेगवेगळ्या त्रुटी दाखवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शासनाने पंचनामाचे प्रस्ताव पुन्हा माघारी तलाठी कार्यालयांकडे पाठवले असल्यानेशेतकरी मदतीपासून वंचित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून शासन स्तरावर त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे शिवाजी जवरे , राजेंद्र उंडे, एडवोकेट सर्जेराव घोडे, किसन काकडे , साहेबराव चोरमल , शरद पवार राजेंद्र गोरे , बबनराव उघडे, ईश्वर दरंदले, शरद पठारे, ज्ञानदेव पठारे, आदींनी केली आहे.
