श्रीरामपूरात आता ‘सब कुछ विखे पाटील’;मा. खा.सुजय विखेंनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग

श्रीरामपूर-नितीन शेळकेस्थानिक स्वराज्य संस्था आणि श्रीरामपूर नगरपरिषदेची निवडणूक यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मा.खा.सुजय विखे पाटील यांनी नुकतीच...

श्रीरामपूर-नितीन शेळके
स्थानिक स्वराज्य संस्था आणि श्रीरामपूर नगरपरिषदेची निवडणूक यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मा.खा.सुजय विखे पाटील यांनी नुकतीच श्रीरामपूर शहरात दिवसभर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.यात आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार तसेच नगरसेवकपदांच्या उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.त्यानंतर पत्रकार परिषद घेवून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली आगामी निवडणूक काळातील भूमिका स्पष्ट केली.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण 2 नोव्हेंबर रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगून त्यांनी इथून पुढच्या काळात श्रीरामपूर शहरासह तालुक्याच्या विकासाचा चेहरा हा विखे पाटील हेच राहणार असल्याचे स्पष्ट केले.स्व.जयंतराव ससाणे यांच्यानंतर श्रीरामपूरचा विकास करू शकेल असे खमके नेतृत्वच इथे तयार झाले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्रीरामपूरच्या विकासाची ती पोकळी आता आपण भरून काढणार असून येत्या वर्षभराच्या काळात श्रीरामपूर शहरात फोफावलेली गुन्हेगारीही मुळासकट साफ करू,असा शब्द त्यांनी यावेळी दिला. शिर्डीनंतर आता श्रीरामपूरातील गुन्हेगारीचा नायनाट आपण करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.त्याचवेळी शहरासह तालुक्यातील मतदारांनी फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करावे,असे आवाहनही त्यांनी केले.याबरोबरच ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना भाजप पक्षात चांगले भविष्य आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात श्रीरामपूरात राजकीय भूकंप झाला तर आश्चर्य वाटायला नको,असे राजकीय भाकीत वर्तवून विखे पाटील यांनी मोठी खळबळ उडवून दिली.त्यांच्या या भाकितानंतर सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या मनात चलबिचल निर्माण झाली.भाजपातील नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांना लागलीच या संभाव्य भूकंपाचे धक्के जाणवायला लागले.एकनिष्ठ विखे समर्थक कार्यकर्त्यांनाही याबाबत कुठलाच अंदाज दिसून येत नाही.काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपात घेऊन याअगोदरच विखे पाटील यांनी काँग्रेसला खिंडार पाडलेले असताना आता नगरपरिषद निवडणूकीच्या तोंडावर आणखी कुणाला भाजपात प्रवेश देऊन ते राजकीय भूकंप घडवू पाहत आहेत,याविषयी त्यामुळेच उत्सुकता निर्माण झाली आहे.दरम्यान यावेळी सुजय विखे पाटील यांनी निवडणूका ह्या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असून विधानसभा निवडणुकीत जे काही झाले ते आता होणार नाही,हेही त्यांनी ठासून सांगितले.त्याचबरोबर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेमधील नेमक्या कोणत्या नेत्याबरोबर युतीची बोलणी करायची हे आपल्याला दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावे असा चिमटाही विखे पाटील यांनी त्या दोन्ही पक्षातील सध्याचे स्थानिक राजकिय संदर्भ देत काढला.श्रीरामपूर शहराची पुढील पाच वर्षांचे विकासकामे नगरपरिषदेमार्फत केली जाणार आहेत.आगामी २५ वर्षांचे शहर उभे करण्याचा मानस आहे.अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन, उपनगर विकसित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे याला प्राधान्य देणार असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक विखे पाटील यांच्या घरातील व्यक्ती लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर ‘विखे पाटील हेच श्रीरामपूरच्या विकासाचा चेहरा’ या मा.खा.सुजय विखे पाटील यांच्या वाक्यानेच आता त्या चर्चेचा समारोप होतो का,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!