खानापूर परिसरात तीन बिबटे अडकले पिंजऱ्यात;बिबट्यांच्या दहशतीतुन शेतकरी व विद्यार्थ्यांची अखेर सुटका

श्रीरामपूर –श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर परिसरात भामाठान-खानापूर रस्त्यावर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सलग तीन दिवस तीन बिबटे अडकले आहेत.त्यामुळे परिसरातील शेतकरी व...

श्रीरामपूर –
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर परिसरात  भामाठान-खानापूर रस्त्यावर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सलग तीन दिवस तीन बिबटे अडकले आहेत.त्यामुळे परिसरातील शेतकरी व शाळकरी मुलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरलेली होती.शेतकऱ्यांना शेतात दिवसा काम करणे देखील कठीण होऊन बसले होते. दुधाळ जनावरांना चारा आणण्यासाठी दररोज शेतात जाताना महिला वर्गही घाबरत होता.खानापूर शिवारात भामाठाण रस्त्यावर शाळकरी मुलांना रस्त्यावरून तीन बिबटे जाताना दिसले होते. त्यामुळे धास्तावलेल्या आजूबाजुच्या वस्त्यावरील शेतकऱ्यांनी ही वार्ता  पशुवैद्यकीय डॉ. दादासाहेब आदिक यांच्या कानावर घातली त्यांनी वनरक्षक राहुल कानडे यांच्याशी संपर्क साधला. वन विभागाच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे पिंजरा एका स्पॉटवर आहे. त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या वाहनातून पिंजरा घेऊन जावा लागेल, असे सांगण्यात आले. खानापूरच्या तरूणांनी टॅक्टर ट्रॉलीमधून बोरावके फार्म ब्राम्हणगाव शिवार येथून पिंजरा आणला व पिंजरा बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात लावण्यात आला. भाऊसाहेब जोर्वेकर यांनी बिबट्या ला भक्ष्य म्हणून आपला बोकड आणून पिंजऱ्यात ठेवला.अखेर शनिवार दि. १८ रोजी पहाटे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी पिंजरा जागेवर ठेवून दुसऱ्या पिंजऱ्यात बिबट्यास नेले. दुसऱ्या दिवशी रविवारी दि. १९ रोजी पहाटे पुन्हा एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान खानापूरसह गोदावरी नदीच्या काठावरील दोन्हीही बाजूच्या गावांत अलीकडच्या काळात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!