खानापूर परिसरात तीन बिबटे अडकले पिंजऱ्यात;बिबट्यांच्या दहशतीतुन शेतकरी व विद्यार्थ्यांची अखेर सुटका

श्रीरामपूर –श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर परिसरात भामाठान-खानापूर रस्त्यावर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सलग तीन दिवस तीन बिबटे अडकले आहेत.त्यामुळे परिसरातील शेतकरी व...

श्रीरामपूर –
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर परिसरात  भामाठान-खानापूर रस्त्यावर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सलग तीन दिवस तीन बिबटे अडकले आहेत.त्यामुळे परिसरातील शेतकरी व शाळकरी मुलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरलेली होती.शेतकऱ्यांना शेतात दिवसा काम करणे देखील कठीण होऊन बसले होते. दुधाळ जनावरांना चारा आणण्यासाठी दररोज शेतात जाताना महिला वर्गही घाबरत होता.खानापूर शिवारात भामाठाण रस्त्यावर शाळकरी मुलांना रस्त्यावरून तीन बिबटे जाताना दिसले होते. त्यामुळे धास्तावलेल्या आजूबाजुच्या वस्त्यावरील शेतकऱ्यांनी ही वार्ता  पशुवैद्यकीय डॉ. दादासाहेब आदिक यांच्या कानावर घातली त्यांनी वनरक्षक राहुल कानडे यांच्याशी संपर्क साधला. वन विभागाच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे पिंजरा एका स्पॉटवर आहे. त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या वाहनातून पिंजरा घेऊन जावा लागेल, असे सांगण्यात आले. खानापूरच्या तरूणांनी टॅक्टर ट्रॉलीमधून बोरावके फार्म ब्राम्हणगाव शिवार येथून पिंजरा आणला व पिंजरा बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात लावण्यात आला. भाऊसाहेब जोर्वेकर यांनी बिबट्या ला भक्ष्य म्हणून आपला बोकड आणून पिंजऱ्यात ठेवला.अखेर शनिवार दि. १८ रोजी पहाटे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी पिंजरा जागेवर ठेवून दुसऱ्या पिंजऱ्यात बिबट्यास नेले. दुसऱ्या दिवशी रविवारी दि. १९ रोजी पहाटे पुन्हा एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान खानापूरसह गोदावरी नदीच्या काठावरील दोन्हीही बाजूच्या गावांत अलीकडच्या काळात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!