श्रीरामपूर –
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी वनविभागाची ‘ना हरकत दाखला’ (NOC) अखेर प्राप्त झाली आहे. ही परवानगी मिळाल्यामुळे श्रीरामपूर रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळावर स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.या ऐतिहासिक यशाचा जल्लोष निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे पेढे वाटून सर्व भीमअनुयायांनी आनंदोत्सव साजरा केला.
या यशामध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे विशेष योगदान असल्याने त्यांचा अभिनंदनचा ठराव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी मांडला.तो सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर केला.यावेळी सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की,आता लवकरच भीम अनुयायांचे स्वप्न साकार होणार आहे. भव्य दिव्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक श्रीरामपुरात उभे राहील. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी कामाचा शुभारंभ दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. लवकरच या सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.यावेळी राजू नाना गायकवाड ,विजय पवार, रमाताई धीवर संजय रूपटक्के, संजय बोरगे, विशाल सुरडकर, प्रकाश ढोकणे, अमोल साबणे,दादासाहेब बनकर, डॉ. राजीव साळवे,संजय रूपटक्के, दादासाहेब बनकर,बाळासाहेब बागुल, अल्ताफभाई शेख,विठ्ठल गालफाडे, अमोल मिसाळ, रॉकी लोंढे, किशोर अभंग, अशोक बागुल, गोरख आढाव, सुरेश शेळके, किशोर फाजगे, ॲड मिलिंद धीवर,कल्पनाताई तेलोरे, वंदनाताई गायकवाड, उज्वलाताई येवलेकर, संगीताताई साळवे,कारभारी त्रिभुवन आदी उपस्थित होते.
