शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवरील ‘होल्ड’ काढून शासन मदत मिळू द्या;हरिहर फाउंडेशनचे तहसीलदारांना निवेदन

श्रीरामपूर-दुष्काळ आणि पीक नुकसानामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्ज खाते व्याज न भरल्यामुळे होल्ड किंवा लिंक ठेवण्यात...

श्रीरामपूर-
दुष्काळ आणि पीक नुकसानामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्ज खाते व्याज न भरल्यामुळे होल्ड किंवा लिंक ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे शासनाकडून येणारी दुष्काळ सहाय्यता आणि पीकविमा रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे, तर बँकांमध्ये व्याज वेळेवर न भरल्यामुळे त्यांना अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळते.या कठीण परिस्थितीत श्री हरिहर फाउंडेशन, बेलापूर ने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यांवरील होल्ड/लीन त्वरित मुक्त करावेत, जेणेकरून शासनाकडून येणारी मदत रक्कम शेतकऱ्यांपर्यंत अडथळ्याशिवाय पोहोचू शकेल आणि आर्थिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे निवेदनात हरिहर फाउंडेशनच्या वतीने मागणी करण्यात आली.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम नाईक व सहकारी भगवानराव सोनवणे, विजयराव कुर्हे, विजयराव शेलार, मधुकर ठोंबरे, सुरेश जाधव, अमन सय्यद, ओम कुमावत, रवींद्र अमोलिक, इमाम पठाण, सचिन पवार उपस्थित होते. फाउंडेशनच्या या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!