पालकमंत्री विखे पाटील मोटरसायकलवरून थेट पूरग्रस्तांच्या मदतीला;नुकसानग्रस्त नागरिकांना दिला धीर

श्रीरामपूर-राहत्यासह तालुक्यातील कोल्हार,लोणी आणि पंचक्रोशी भागात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. रविवारी सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

श्रीरामपूर-
राहत्यासह तालुक्यातील कोल्हार,लोणी आणि पंचक्रोशी भागात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. रविवारी सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष करून बाधित गावांची पाहाणी केली. कोल्हारमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील थेट मोटरसायकलवरून पूरग्रस्त परिसरात पोहोचले. परिस्थितीची थेट पाहणी करण्याची त्यांची पद्धत सर्वांना भावली आणि नुकसानग्रस्त नागरिकांना काहीसा आधार मिळाला.यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून आवश्यक ती मदत देण्याचे आदेश दिले.
राहाता तालुक्यात केवळ एका रात्रीत २०० मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने ग्रामीण आणि शहरी भाग पाण्याखाली गेला. शेतजमिनी तसेच नागरी वसाहतींमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.कोल्हार परिसरात पाहणीदरम्यान पाणी नालींमध्ये अडकून राहिल्याचे कारण अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे  पालकमंत्री विखे पाटील यांनी तातडीने नाले व प्रवाह अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिले.पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाचारण करण्यात आले. प्रशासनाकडून बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या तर स्थानिक युवकांनी कुटुंबांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.लोणी बुद्रुक, पाथरे आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधून तातडीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कोल्हारमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील थेट मोटरसायकलवरून पूरग्रस्त परिसरात पोहोचले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!