श्रीरामपूर–मुंबई बससेवा सुरू होणार;सर्वपक्षीय आंदोलकांना एसटी प्रशासनाचे आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आज एसटी आगार श्रीरामपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आज एसटी आगार श्रीरामपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत एसटी आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी 6 ऑक्टोबरपासून बस सेवा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रिपाईचे जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले,
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसाठी श्रीरामपूरहून थेट बस सेवा उपलब्ध नसणे ही खेदजनक आणि संतापजनक बाब आहे. कोरोना काळापासून ही सेवा बंद असल्यामुळे व्यापारी, महिला, वृद्ध व प्रवासी वर्गाला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या निवेदन व आंदोलनाच्या लढ्याला आज यश मिळाले. ही एकजुटीची ताकद असून, जनता आणि विविध पक्षांच्या पाठबळामुळे हे शक्य झाले आहे.या आंदोलनात लहुजी शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लहू खंडागळे, भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफ शेख, मर्चंट असोसिएशनचे सदस्य योगेश ओझा, शरीफ शेख, आसिफ मणियार राकेश थोरात, किशोर ओझा असलम आत्तार कैलास बाविस्कर गणेश पालकर गणेश कुवर प्रदीप निकम यांचाही सक्रीय सहभाग होता.तसेच, यावेळी एसटी वाहतूक निरीक्षक अनिल पठारे, वरिष्ठ लिपिक राकेश सोनवणे आदी एसटी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.6 ऑक्टोबरपासून सुरू होणारी श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!