पीक विम्याचे 190 कोटी न्यायालयात जमा करा;राज्य सरकारला दणका

श्रीरामपूर-खरीप व रब्बी हंगाम 2020-21 च्या थकीत पिक विमा नुकसान भरपाईसाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये ऍड.अजित काळे...

श्रीरामपूर-
खरीप व रब्बी हंगाम 2020-21 च्या थकीत पिक विमा नुकसान भरपाईसाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये ऍड.अजित काळे यांच्यामार्फत दाखल याचिकेवर न्यायमूर्ती आर.जी.अवचट व न्यायमूर्ती ए. डि.शिंदे यांच्या खंडपीठाने 190 कोटी 72 लाख रुपये राज्य सरकारला चार आठवड्यात उच्च न्यायालयात जमा करण्याचा आदेश दिला  आहे.तसेच पुढील सुनावणी सदरील रक्कम जमा झाल्यानंतर चार आठवड्याने होईल,असेही न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितले आहे.
खरीप व रब्बी हंगाम 2020 मध्ये परभणी जिल्ह्यातील 84693 शेतकऱ्यांची एकूण 61 कोटी 15 लाख रुपये थकीत नुकसान भरपाई आणि थकीत रकमेवरील व्याज मिळावे यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली. या याचिके मध्ये एकूण सात प्रतिवादी आहेत. ज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार,  कृषी आयुक्त पुणे,जिल्हाधिकारी परभणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांचा समावेश आहे. संबंधित विषयात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने देखील स्वतंत्रपणे याचिका दाखल केलेली आहे. खरीप हंगाम 2020 मध्ये 72 हजार 393 शेतकऱ्यांचे 55 कोटी 10 लाख रुपये थकीत आहेत. तर रब्बी हंगाम 2020-21 मध्ये 12 हजार 300 शेतकऱ्यांचे 6 कोटी 5 लाख रुपये पिक विमा कंपनीकडे थकीत आहेत. शेतकऱ्यांची बाजू मांडणारे ऍड.अजित काळे यांनी अंतिम नुकसान भरपाई अदा करण्या संदर्भातला निर्णय येईपर्यंत,कंपनीकडे जमा असलेल्या विमा अनुदान हप्त्याच्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात यावी अशी भूमिका न्यायालयात मांडली.त्यानुसार खरीप व रब्बी हंगाम 2020 मध्ये एकूण मिळून 61 कोटी 15 लाख रुपये थकीत होते. ज्यापैकी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार 13 कोटी 88 लाख रुपये नुकसान भरपाई कंपनीकडे एकूण जमा झालेल्या पिक विमा अनुदान हप्त्याच्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रिलायन्स जनरल इन्शुरन्स पिक विमा कंपनीकडे एकूण 47 कोटी 26 लाख रुपये नुकसान भरपाई थकीत आहे.दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या सुनावणीत सदर शेतकरी मागील साडेचार वर्षाच्या काळापासून हक्काच्या पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित आहे. पिक कर्जास सुरक्षितता म्हणून शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला होता. देय नुकसान भरपाई प्रलंबित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत झाले.त्यावरील व्याजाचा बोजा वाढला. शेतकऱ्यांचे पतमानांकन घसरले या सर्व बाबीस राज्य सरकारची दप्तर दिरंगाई कारणीभूत ठरली असल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती आर जी अवचट व न्यायमूर्ती ए डि शिंदे यांच्या खंडपीठाने 190 कोटी 72 लाख रुपये राज्य सरकारला चार आठवड्यात उच्च न्यायालयात जमा करण्याचा आदेश दिला.तसेच पुढील सुनावणी सदरील रक्कम जमा झाल्यानंतर चार आठवड्याने होईल, असे न्यायालयाने सांगितले.ऍड. अजित काळे यांच्या मुद्देसूद मांडणी नंतर न्यायालयाने दिलेल्या अंतरीम आदेशाचे याचिकाकर्ते शेतकरी हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे, गोविंद लांडगे, कृष्णा सोळंके व माधव घुन्नर यांच्यामार्फत स्वागत करण्यात आले आहे.

याचिकाकर्ते शेतकरी समवेत ऍड. अजित काळे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!