कापूस उत्पादकांना क्विंटलला ४ हजारांचा फटका?आयात शुल्कमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांत संताप

श्रीरामपूर-केंद्र सरकारने कापूस आयातीवर असलेले ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याच्या निर्णयाने कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे...

श्रीरामपूर-
केंद्र सरकारने कापूस आयातीवर असलेले ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याच्या निर्णयाने कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीन ते चार हजार रुपये कमी भाव मिळेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे.कांदा उत्पादक शेतकरी यंदा कमी भाव मिळाल्याने अगोदरच आर्थिक संकटात असताना आता कापसाच्या या तुघलकी निर्णयामुळे शेतकरी पुरता भरडला जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या अध्यादेशाची ठिकठिकाणी होळी करून निषेध केला जात आहे.अखिल भारतीय किसान सभा व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दि. १, २, ३ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि.२) शेवगाव येथील क्रांती चौक येथे आंदोलन करत त्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.
शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा असून तो निषेधार्ह आहे, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे यांनी या प्रसंगी केली.केंद्र सरकारने कापसावर ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्यामुळे भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. एकीकडे अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला आहे; दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने अमेरिकन कापूस आयातीवरील ११ टक्के करमाफी केली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल कमी भावात कापूस विकावा लागणार असून शेतकरी आर्थिक संकटात येतील. केंद्र सरकारने हा अध्यादेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, कॉ. संदीप इथापे, कॉ. भगवानराव गायकवाड, कॉ. बापूराव राशिनकर, कॉ. बबनराव पवार, कॉ. दत्तात्रय आरे, कॉ. रामभाऊ लांडे, कॉ. विष्णू गोरे, कॉ. भिवा घोरपडे, कॉ. बाबूलाल सय्यद, कॉ. विठ्ठल उगले आदी आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!