श्रीरामपूर-
श्रीरामपूरचे भूमिपुत्र व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर रामराव आदिक यांनी तालुक्याच्या वैभवात भर घातली असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले.
श्रीरामपूर नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्यावतीने येथील कचेरी रोडवरील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या पुण्यतिथनिमित्त त्यांच्या अर्धपुतळयास हार घालून अभिवादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले यावेळी ते बोलत होत. यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक , उत्तमराव पवार, बापूसाहेब सदाफळ, बबनराव आदिक, नगरपालिकेचे अभियंता सूर्यकांत गवळी ,लेखापाल गाडेकर, ग्रंथपाल स्वाती पुरे,सुभाष त्रिभुवन, कडू भाऊ आदिक, भागचंद औताडे ,मनीषा थोरात, अर्चना पानसरे ,जयंत चौधरी, हंसराज आदिक ,नितीन पवार, सुनील थोरातकैलास बोर्डे , मुक्तार शहा ,अल्तमश पटेल,साजिद मिर्झा,सैफ शेख,विजय खाजेकर, आदित्य आदिक, प्रशांत खंडागळे, रवी गरेला,संजय प्रधान,गोरख दोंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.तसेच खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका ,शिक्षक, शिक्षिका, कर्मचारीवृद आदी उपस्थित होते.निपाणी वडगाव येथील रामराव ते पब्लिक स्कूल मध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर रामराव आदीक यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक , माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक ,शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.
